Thursday 4 June 2020

पालकमंत्री आले…बैठकीनंतर पाल्यांशी चर्चा सोडून,बंगल्यावर गेले…

गोंदिया(खेमेंद्र कटरे),दि.03ः-राज्यात नव्हे देशातच करोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.त्यामुळे त्या त्या जिल्ह्यातील अधिकारीसह त्या जिल्ह्याच्या पालक असलेल्या मंत्र्याचीही तेवढीच महत्वाची भूमिका असते.आमच्या जिल्ह्याचे अहोभाग्य आम्हाला गृहमंत्री असलेले पालकमंत्री लाभलेे.करोना संसर्गाच्या प्रादुर्भावानंतर राष्ट्रवादीचे नेते खा.प्रफुल पटेल यांच्याशी थोडं जिल्हाधिकांर्याचे बिनसले त्यामुळे पालकमंत्र्यांना गोंदियाला येत एक बैठक 26एप्रिल रोजी घ्यावी लागली.ते आले…बैठक घेतली…..खा.पटेलांच्या इच्छेचे समाधान करुन ते निघून गेले.त्यावेळीही जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांशी एवढ्या मोठ्या संसर्गाशी लढा सुरु असल्याने आपणही त्यांना काही सांगू असे वाटले नाही.त्यावेळी तेवढे कुणी मनावरही घेतले नाही.पण तब्बल पुन्हा सव्वा महिन्यानंतर ते जिल्हा मुख्यालयी अवतरले,ते 3 जून रोजी मात्र कुणालाही न सांगता आणि प्रसारमाध्यमात गाजावाजा न करता.दुपारी 12.45 वाजता त्यांचे आपल्या मुंबईवरुन आणलेल्या गृहमंत्र्यांच्या ताफ्यातील लवाजम्यासह गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोचले.तेव्हा कुठे पालकमंत्री आलेत असे कळले.पालकमंत्री आले म्हटल्यावर पालक असलेल्या जिल्ह्यातील लेकरांचीही नक्कीच अपेक्षा की आपले पालक आपल्याला नक्कीच भेटणार…पण त्या आशेवरही पाणी फेरले गेले.याच करोनाच्या काळात जिल्हाधिकारी यांनी प्रसारमाध्यमांशी वागण्याची बदललेली भूमिका…जिल्हा प्रशासनाने केलेले असहकार्य त्यातही प्रसारमाध्यमांनी आपली भूमिका निष्ठेने पार पाडत करोना संसर्ग काळात सहकार्याच्या भूमिकेतच काम केले.परंतु कुठल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीने जिल्हाधिकारी असो,नोडल अधिकारी असो की जिल्हा शल्यचिकित्सकासह जिल्ह्याचे पालकमंत्री असो त्यांना त्यांना प्रतिसाद नक्कीच दिला असेल असा जनतेचा समज पण तो समज या सर्वांनी गैरसमजच ठरविला.पहिला रुग्ण मिळाला तेव्हाही जिल्हाधिकारीच काय पहिला रुग्ण करोनामुक्त घऱी होऊन परतल्यावर आलेल्या पालकमंत्र्यानीही प्रसारमाध्यमांशी सवांद साधायचे साधे सौजन्य दाखविले नाही.तरीही आपली एक समाजाभिमूख भूमिका पार पाडायची या गोष्टीला मनात ठेवत सर्वच प्रसारमाध्यांनी जिल्हाप्रशासनाला सहकार्य केले.त्या सहकार्य करणार्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंचा जिल्हाधिकारी व जिल्ह्याच्या पालकमंत्र्याना एवढा कसला विटाळ आला की त्यांनी त्यांचे भ्रमणध्वनी स्विकारण्यापेक्षा आपल्या अधिनस्थ कर्मचार्यामार्फेत कुणाचा रे फोन कर चौकशी अशा प्रकार केला.तरीही आम्ही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी शांतपणे सहकार्याच्या भूमिकेतच(निवडक काही जी हूजुरी करणारे सोडले तर)राहिलो.करोनाच्या टेस्ट या जरी नागपूरात होत असल्या तरी तिन टप्यात त्यांचे निकाल दिले जातात,मात्र पुर्व विदर्भातील सर्व जिल्हे वगळता आमच्या जिल्ह्यात सकाळची माहिती रात्रीला देणारा जिल्हाप्रशासन किती सक्षम हेच दाखवण्यात राहिले.त्यातही प्रसारमाध्यमांना माहित होण्याआधीच इतर सोशल मिडियावर माहिती मिळणे हे सुध्दा आमच्या जिल्हाप्रशासनाच्या सजगतेचेच द्योतक म्हणायला काय हरकत.या सर्व बांबीचा विचार करुन कधी आपला पालक येईल आणि त्यांच्यासमोर या सर्व गोष्टींचा पिठारा उघडणार या विचारात राहिलेल्या प्रसारमाध्यमांना मात्र आज बुधवार 3 जून रोजी आपल्या आकस्मिक दौर्यात ते सुध्दा जिल्ह्यातील एकाही आमदार व खासदाराला न सांगता(राष्ट्रवादी आजी माजी खासदार व आमदार वगळता)आलेल्या पालकमंत्र्याकंडून चांगल्याच अपेक्षा भंग झाल्या.दुपारी 12.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेल्या पालकमंत्र्यांनी 2.10 वाजेपर्यंत करोनाचा आढावा घेतला.त्या आढावा बैठकीनंतर मात्र सरळ जेवणासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या रामनगर बंगल्यात दाखल झाले.तर त्यांचे सर्व सहकारी हे शासकीय विश्रामगृहात थांबले.साहेब 2.30 वाजता रामनगरच्या बंगल्यात जे गेले ते सायकांळी 5.20 ला शासकीय विश्रामगृहात दाखल झाले.तब्बल 3 तास बंगल्यात वेळ घालवल्यानंतर ते सायकांळी 7 वाजता विश्रामगृहातून आपल्या गंतव्यस्थान असलेल्या नागपूरकडे रवांना झाले.बैठकीनंतर तब्बल 5 तास गोंदियात आपल्या नेत्याच्या घरी व विश्रामगृहात वेळ घालविणार्या पालकमंत्र्यांना जिल्हामुख्यालयातील प्रसारमाध्यमांशी संवाद साधायला का भिती वाटली.जी भिती त्यांना महाराष्ट्रातील इतर जिल्हे फिरतांना वाटली नाही.प्रत्येक जिल्ह्यात प्रसारमाध्यमांशी सवांद साधणारे राज्याचे गृहमंत्री मात्र आमच्या पालकमंत्र्यांना आपल्याच पालक जिल्ह्यातील पत्रकारांशी सवांद का साधू नये असे वाटले.त्यांना काय जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपण संवाद साधू नका,नाहीतर आम्ही या दोन महिन्यात प्रसारमाध्यमांशी केलेल्या वर्तुणीकीचा पाळा वाचला जाईल असे सांगितले.की त्यांचे आका असलेल्या राष्ट्रवादीच्या त्या नेत्यातील बंगल्यातून सांगण्यात आले हे सर्व आपलेच आहेत काही गरज नाही,त्यांच्याशी सवांद साधायची.तुम्ही या बैठक घ्या इतर आमदारांनाही बोलावू नका आपलं ते कायं जमवून घ्या……आणि आम्ही सांगितलेंल तेवंढ मात्र बघून निघून जा,इथल्या प्रसारमाध्यमांना काय सांगायचं ते आम्ही सांगू ते आमच्या बाहेर नाहीत असा दाखविण्याचा तर हा प्रयत्न नव्हे ना.असला तरीही पालकमंत्री साहेब हे प्रसारमाध्यम आहे,हे विसरुन कसं चालणार..भंडार्यातील राष्ट्रवादीचे नेतेही तुमच्या दिमतीला गोंदियाच्या विश्रामगृहात पोचत असतील,स्थानिक माजी आमदारही पोचत असतील आणि त्यांनाही हे सर्व दिसत असतांना गप्प राहत असतील तर यापेक्षा दुसरं दुर्देव सुध्दा म्हणता येणार नाही.आपण आलात कशाचा आढावा घेऊन गेलात ते तुम्हालाच ठाऊक मात्र पालकाची भूमिका पार पाडण्यात आपण अपयशी ठरण्याच्या मार्गावर आहात हे मात्र नक्की म्हणावे लागेल.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...