Friday 30 September 2016

डॉ.सूर्यवंशी हे आदर्श जिल्हाधिकारी- आ.गोपालदास अग्रवाल


 

गोंदिया, दि.३० : जिल्हाधिकारी म्हणून काम करतांना डॉ.सूर्यवंशी यांनी सर्वांना सोबत घेवून काम केले आहे. जिल्ह्यात सर्वांशी त्यांनी चांगले संबंध निर्माण केले. जिल्ह्यात सारस महोत्सव, कायापालट योजना यासह अनेक योजना त्यांनी प्रभावीपणे राबविल्या. त्यामुळे डॉ.सूर्यवंशी हे आदर्श जिल्हाधिकारी आहे, असे गौरोदगार राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ.गोपालदास अग्रवाल यांनी काढले.

गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष समिती विस्तार बैठक शनिवारला

Thursday 29 September 2016

मुख्यमंत्र्याचे शहर बनलेय गुन्हेगारांचे माहेरघर, दिवसाढवळ्या खून

नागपूर,दि,29- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे जन्मगाव असलेले आणि ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाणारे उपराजधानीचे शहर नागपूर आता ‘क्राइम कॅपिटल’ म्हणून ओळखू जाऊ लागले आहे.नागपूर शहर गुन्हेगारांचे माहेरघर ठरले असून आपल्याच गृहनगरातील गुन्हेगारी कमी करण्यात मुख्यमंत्र्यांना अपयश आले आहे.त्यांच्याच कार्यकाळात मोठ्याप्रमाणात गुन्ह्यांची संख्या वाढली आहे.

येरलीत शिवसैनिकांनी जाळला नवाज शरीफांचा पुतळा

तुमसर,दि.29 : पाकिस्तानी आतंकवादयांनी जम्मूकश्मीर मध्ये उरी येथील मिलिटरी शिबिरावर केलेल्या हल्यामध्ये १८ भारतीय जवान शहीद झाले, त्या निषेधार्थ तालु्क्यातील येरली येथे  शिवसेनेतर्फे शेकडो शिवसैनिकांनी व ग्रामवासियांनी पाकिस्तानचा  निषेध नोंदवित पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांच्या पुतळ्याचे दहन केले.




आरोग्य उपसंचालकांची ग्रामीण रूग्णालय देवरीला भेट

देवरी,दि.29- महाराष्ट राज्याच्या सिमेवर असलेल्या अतिसंवेदनशिल नक्षलग्रस्त राष्टीय महामार्गाच्या कडेला असलेले देवरी येथे ग्रामीण रूग्णालय आहे. परंतू, रूग्णालयाच्या इमारतीला ३४ वर्ष पुर्ण झाल्याने इमारत जीर्ण होत आहे व त्यामूळे छताचे पापूद्रे खाली पडत असल्याने केव्हाही जिवीतहाणी होउ शकते. तसेच येथे ट्रामा सेंटर असून देखील त्याची सुध्दा इमारत जीर्ण होत आहे. याची दखल घेत आ. संजय पुराम यांनी त्वरीत ग्रामीण रूग्णालय देवरीला भेट देउन इमारतीची पाहणी केली व जनतेची ही अडचण राज्याचे आरोग्यमंत्री ना. दिपक सावंत यांच्या समोर मांडली.

लष्कराचे सर्जिकल ऑपरेशन


सीबीआयच्या जाचाला कंटाळून आत्महत्या?

दिल्ली- स्थानिक मधू विहार येथे राहत्या घरी मुलासह आत्महत्या करणारे उद्योग मंत्रालयाचे माजी महासंचालक बी के बन्सल यांनी आत्महत्येसाठी सीबीआयला जबाबदार ठरवले आहे. ‘सीबीआयच्या अधिका-यांनी माझा आणि माझ्या कुटुंबीयांचा छळ केला असून यामुळेच आत्महत्येचे पाऊल उचलत आहे’ असा उल्लेख बन्सल यांनी आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत केला आहे.

Gondia Essence of India

Wednesday 28 September 2016

पर्यटनः गोंदिया जिल्हा खुणावतोय

राज्याच्या पूर्व टोकावर वसलेला गोंदिया जिल्हा. तलावांचा जिल्हा म्हणून सर्वत्र ओखळ असलेला जिल्हा. निसर्गानेही भरभरून दिलयं. दुर्मिळ प्रजातीचे पक्षी या जिल्ह्यात वास्तव्यास असून पक्षी अभ्यासकांसाठी सुद्धा येथे खजिना उपलब्ध आहे. हिरव्याकंच वनराईने  नटलेल्या या जिल्ह्यात पर्यटनाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. या माध्यमातून येथील आदिवासी  युवकांना प्रशिक्षित करून त्यांना उत्तम रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्या जाऊ शकते. पण त्यासाठी गरज आहे ती राजकीय ईच्छाशक्तीची  - सुरेश भदाडे

BERARTIME 28 Sept - 04 Oct





Tuesday 27 September 2016

ओबीसीसांठी स्वंतत्र मंत्रालय हवेच – नाना पटोले

4 भारतीय महिलांना समझोता एक्स्प्रेसमध्ये चढण्यापासून रोखले

सुकमा जिल्ह्यात चकमकीत दोन नक्षलवादी

कोसबीच्या जंगलात नक्षल्यांनी पेरून ठेवलली स्फोटके पोलिसांनी नष्ट केली

Monday 26 September 2016

गोंदिया पंचायत समितीत आठ लाखांचा घोटाळा

गोंदिया,दि.२६:- गेल्या दहा महिन्यांपासून शिक्षण विभाग सडक/अर्जुनी पंचायत समितीत झालेल्या घोटाळ्यामूळे तोंडघशी पडला. आता गोंदिया पंचायत समितीतील शिक्षण विभागात प्रथमदर्शी आठ लाख रूपये लीपीकाने स्वत:च्या खात्यात वळते केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. प्रकरणाची चौकशी अत्यंत गुप्तरित्या सुरू झाली. जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग गेल्या काही वर्षापासून चर्चेत आहे.

लाचखोर उपविभागीय कृषी अधिकाऱ्यासह एक एसीबीच्या जाळ्यात


देवरी,ता२6- चंद्रपूरच्या एका खासगी कंपनी विरुद्ध कृषी विभागामार्फत गुन्ह्याची नोंद न करण्याचा मोबदला म्हणून देवरीचे कृषी अधिकारी आणि किसान कृषी केंद्राचे संचालकाला पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना चंद्रपूरच्या लाचलुचपत विभागातील अधिकाऱ्यांनी आज सायंकाळी सहाच्या सुमारास रंगेहाथ अटक केली. वृत्त लिहिस्तोवर कारवाई देवरीच्या उपविभागीय कृषी कार्यालयात सुरू होती.

Friday 23 September 2016

पाच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

देवरीच्या ग्रामीण रुग्णालयाची इमारत धोकादायक

२४ सप्टेंबरला ओबीसी संघर्ष कृती समितीची जिल्हा बैठक

जिल्हा व ग्रामीण रूग्णालयात ३४९ पदे रिक्त

लोकमान्य गणेशोत्सवाचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार वक्रतुंड मंडळाला

गोंदिया,दि.22 :राज्य शासनाच्या वतीने लोकमान्य सार्वजनिक गणेश उत्सव अभियान नुकतेच राबविण्यात आले. या अंतर्गत जनजागृती करणाऱ्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना आज पुरस्कार जाहीर करण्यात आले. जिल्हा स्तरीय प्रथम पुरस्कार तिरोडा येतील वक्रतुंड गणेश उत्सव मंडळाने पटकावला. विशेष म्हणजे जिल्हास्तरीय पुरस्कारात गोंदिया शहरातील झगमगाट करणारे एकही गणेश मंडळ येऊ शकले नाही,उलट ग्रामीण भागातील मंडळानी बाजी मारली.

तुमसर पालिकेचे कार्य प्रशंसनीय: राज्यस्तरीय हागणदारीमुक्त पथकाची पाहणी

तुमसर berartimes.com,दि.22 : हागणदारीमुक्त अभियानाची राज्यस्तरीय पथकाकडून पाहणी दरम्यान शहरातील १० मुख्य ठिकाणाची तपासणी करण्यात आली. सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता, परिसरातील स्वच्छता व शहराचे सौंदर्यीकरण भुरळ पाडणारे आहे. विशेष म्हणजे प्रात:वेळी एकही इसम उघड्यावर शौच करताना आढळले नाही. एकंदरीत नगर पालिकेचे कार्य पथकाला प्रशंसनिय वाटले असून केंद्रीय समितीकडे शिफारस करण्यात येत असल्याचे तपासणी समितीने मह्टले आहे.यावेळी राज्यस्तरीय पथकातील नागपूर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रिजवान सिद्धीकी, शोभा राऊत, समाज सेविका दुर्गा भरळे उपस्थित होते.

Wednesday 21 September 2016

नगर पंचायत निवडणुकीत सहभाग घेणार्या केंद्रप्रमुखावर कारवाई कधी?

गोंदिया,दि.20: देवरी नगर पंचायतच्या पार पडलेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख असतांनाही आणि शिक्षण विभागाची कुठलीही परवानगी न घेता निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल केंद्रप्रमुख रामेश्वर हरिचंद वाघाडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुदाम राऊत यानी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

पातागुडम पोलिसांनी जप्त केला नक्षल्यांचा शस्त्रसाठा

BERARTIME 21-27 SEPT





Monday 19 September 2016

आर्थिक नियोजनशून्यतेने शेतकरी आत्महत्यांत वाढ – पी. साईनाथ

नागपूर berartimes.com दि. १९ – - शेती, शेतकरी आणि शेतकरी आत्महत्या हे या देशातील सर्वाधिक दुर्लक्षित विषय आहे. या विषयावर काेणीच काही बोलण्यास तयार नसतो. दुसरीकडे शेतकरी आत्महत्यांची आकडेवारीही कमी दाखवण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न असतात, असा अाराेप करतानाच आर्थिक नियोजनशून्यतेमुळेच शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचे परखड मतही ख्यातनाम कृषी अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी रविवारी व्यक्त केले.

विदर्भ आर्थिक नियोजनशून्यतेने शेतकरी आत्महत्यांत वाढ – पी. साईनाथ

नागपूर berartimes.com दि. १९ – - शेती, शेतकरी आणि शेतकरी आत्महत्या हे या देशातील सर्वाधिक दुर्लक्षित विषय आहे. या विषयावर काेणीच काही बोलण्यास तयार नसतो. दुसरीकडे शेतकरी आत्महत्यांची आकडेवारीही कमी दाखवण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न असतात, असा अाराेप करतानाच आर्थिक नियोजनशून्यतेमुळेच शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचे परखड मतही ख्यातनाम कृषी अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी रविवारी व्यक्त केले.

लाचखोर महिला पोलीस हवलदार जेरबंद

गोंदियाचे नवे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे

गोंदियाचे जिल्हाधिकारी डाॅ.विजय सुर्यवंशी यांची नवी दिल्ली येथे केंद्रीय सरक्षणराज्यमंत्री यांचे खासगी सचिव म्हणून बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांची बदली करण्यात आली आहे.काळे यांना तत्काळ कार्यमुक्त होऊन गोंदिया जिल्हाधिकारी पदाची सुत्रे स्विकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तर नांदेडच्या मु्ख्य कार्यकारीअधिकारी पदावर ए.ए.शिनगारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Sunday 18 September 2016

गोंदियामध्ये 1 डिसेंबर 16 ते 14 फेब्रुवारी 2017 दरम्यान दुसऱ्या ‘सारस महोत्सवा’चे आयोजन


पालकमंत्री ना.राजकुमार बडोले यांची माहिती  
मुंबई, दि. 17 : गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेल्या सारस पक्ष्यासंबंधी पर्यटकांना माहिती व्हावी व तो पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे यावा यासाठी गोंदिया जिल्हा पर्यटन समितीच्या वतीने 1 डिसेंबर 2016 ते 14 फेब्रुवारी 2017 या कालावधीत दुसरे ‘सारस महोत्सव’ होणार आहे. यानिमित्त विविध स्पर्धा, तसचे पर्यटकांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती गोंदियाचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी यांनी आज येथे दिली.
सारस महोत्सवाची माहिती देण्यासाठी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सारस पक्ष्याची माहिती देणाऱ्या सीडीचे तसेच गोंदिया जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या ‘गोंदिया इसेन्स ऑफ इंडिया’ या माहिती पटाचे अनावरण करण्यात आले.
श्री. बडोले म्हणाले की, गोंदिया जिल्ह्याला सांस्कृतिक, निसर्गाचा मोठा वारसा लाभला आहे. जिल्ह्यातील तलावे, प्रेक्षणीय स्थळे आहेत. तसेच उडणारा सर्वात उंच पक्षी म्हणून ओळखला जाणारा सारस पक्षी या जिल्ह्यात आढळून येते. पर्यटनासाठी मोठी संधी या जिल्ह्याला उपलब्ध असून त्याची ओळख जगाला उपलब्ध व्हावी, यासाठी गोंदिया महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. तसेच सर्वात सुंदर असलेल्या सारस पक्ष्याची ओळख जगाला व्हावी, लोकांना त्याच्याबद्दलची माहिती व्हावी, यासाठी ‘सारस महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले. या काळात सारस पक्ष्याची छायाचित्रे काढण्याची संधी मिळणार आहे.
गोंदिया महोत्सवादरम्यान येणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्यातील दहा प्रेक्षणीय स्थळे दाखविण्यात येणार आहेत. तसेच नवेगाव नागझिरा फोटोशूट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी www.gondia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. या महोत्सवास जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. बडोले यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी श्री. सुर्यवंशी म्हणाले की, सारस पक्ष्याच्या रुपाने गोंदिया जिल्ह्याला देखणा पक्षी लाभला आहे. या पक्ष्याबद्दलची स्थानिकांची गैरसमजूत काढून या पक्ष्याच्या संवर्धनासाठी त्यांचा सहभाग घेण्यासाठी सारस महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. याकाळात या पक्ष्याच्या संवर्धनासाठी जनजागृती कार्यक्रम केले जात असून त्यात स्थानिकांचा सहभाग घेतला जातो. गेल्या वर्षीच्या महोत्सवाला सुमारे 350 वन्यजीव  छायाचित्रकारांनी उपस्थिती दर्शविली होती. सध्या जिल्ह्यात 45 सारस पक्षी आहेत. पुढील काळात त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.





Saturday 17 September 2016

घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक

चंद्रपूर दि. 17 : शहरासह राज्यातील विविध ठिकाणी आणि परराज्यातही घरफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या एका आंतरराज्य घरफोडी टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे़. या प्रकरणात मध्यप्रदेशातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून, टोळीकडून सोने-चांदीचे दागिने आणि पाच दुचाकीसह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे़.

चक्रीघाटात दोन बसेसची धडक, 20 प्रवासी प्रवासी

एका नक्षल्यास अटक, तिघांचे आत्मसमर्पण

खासदार दत्तकग्राम पाथरीतील विकासकामात भ्रष्टाचार-नागरिकांचा आरोप

गोंदिया,दि.१६ -जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील पाथरी हे गाव खासदार दत्तक ग्राम योजनेतर्गंत विकासाकरीत राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दत्तक घेतले.त्या गावाच्या विकासासाठी खा.पटेलांनी आपल्या खासदारनिधीसह अदानी फाऊडेंशनच्या सीएसआर व शासकीय योजनेच्या इतर निधीची कामे प्रस्तावित केली. खासदार आदर्श ग्राम पाथरीची निवड प्रफुलभाईंनी करताच संपूर्ण गावकèयांनीही आपूलकीने व एकजुटीने लोक सहभाग दिला.खासदार पटेलांनी घेतलेल्या प्रथम आढावा बैठकीतच तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अमीत सैनी आणि पत्रकारांसमोर गावात होणारी विकास कामे दर्जेदार व गुणवत्तेदार व्हावी, अशी सुचना दिली होती.मात्र ग्राम पंचायतीची सत्ता स्वतःकडे काबिज होण्यापुर्वी खा. पटेल यांचे प्रतिनिधी गोरेगाव पंचायत समितीचे सदस्य केवल बघेले यांनी आपुलकीचा ढोंग रचत गावामध्ये ग्रामपंचायत निवडणूक न घेता निर्विरोध व्हावी,अशी गावकèयांची अपेक्षा असतांना सुध्दा स्वतःचा स्वार्थासाठी गावात स्पर्धात्मक निवडणूका बघेलेंमुळे झाल्या

शाळेत तंबाखूजन्य पदार्थ खाऊन जाणारे शिक्षक निलंबित होणार

शिक्षकाचा 7 वर्षीय मुलीवर बलात्कार

विज कोसळुन एक ठार, एक जखमी

चांदूर रेल्वे, ,दि.16-तालुक्यातील जावरा येथे विज कोसळुन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असुन एक जण जम्भीर जखमी झाल्याची माहिती आहे. चांदुर रेल्वे वरून १२ किमी अंतरावर असलेल्या जावरा ये़थील शेतकरी पवन नीलकंठ घाटे व राहुल अरविन्द ठाकरे गुरूवारी संध्याकाळी ४ च्या दरम्यान घरचे जनावर चारायला घेवुन गेले असता पवन घाटे (वय २१) व राहुल ठाकरे यांच्यावर विज कोसळली.

मोहाची दारू समजून अ‍ॅसिड पिल्याने दोन जणांचा मृत्यू

गडचिरोली,दि.16-भामरागड तालुक्यातील टेकला येथे मोहफुलाची दारू समजून अ‍ॅसिड पिल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना १३ व १५ सप्टेंबर रोजी घडली. मृतकांमध्ये पुरूषासह एका महिलेचाही समावेश आहे. १२ सप्टेंबर रोजी टेकडा गावात नवा पंडूम सण साजरा करण्यात आला. त्यानंतर १३ सप्टेंबरला कमली लालसू वड्डे (२३) व गोंगलू पुसू नरोटी (७०) या दोन्ही व्यक्तींनी मोहाची दारू समजून अ‍ॅसिड प्राशन केले.

विहिरीतील विषारी वायूने दोघांचा मृत्यू

Wednesday 14 September 2016

शेप महाबचत गटाने केला २.८ कोटी रूपयांचा अपहार

मानव विकासः एसटीचे समोरील टायर फुटले





गोंदिया,14 (berartimes.com)- सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाला शासनाने मानवविकास योजनेतून दिलेल्या एसटी बसचे टायर काल गोरेगाव तालुक्यातील मोहाडी नजीक फुटल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित वा वित्तीय हानी झाली नाही. दरम्यान, महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे पालकांनी शालेय विद्यार्थिनींच्या जिवितासंबधी चिंता व्यक्त केली आहे.

BERAR TIMES 14 - 20 SEPT





Tuesday 13 September 2016

वीज वितरण कार्यालयाला लागलेल्या आगीत ४५ हजाराचे साहित्य खाक



देवरी- स्थानिक वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयाला काल लागलेल्या आगीत सुमारे ५० हजाराचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आज मंगŸळवारी (ता. १३) आग लागलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरु होते. दरम्यान. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अग्निशमन यंत्र नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सविस्तर असे की, देवरी येथील वीज वितरण कंपनीचे विभागीय कार्यालय आहे. काल सोमवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे या कार्यालयाच्या एका खोलीला आग लागली. ही आग तांत्रिक विभागात असलेल्या इन्वर्टर सेक्शनजवळ लागल्याने तेथे असलेले इन्वर्टर, २ बॅटèया, एक अलमारी आणि काही महत्त्वाच्या फायली जळून खाक झाल्या. यात कंपनीचे सुमारे ५० हजाराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, सदर इन्वर्टर हे तांत्रिक विभागात अत्यंत अडचणीच्या ठिकाणी ठेवले असून कार्यालयीन वेळेत सदर घटना घडली असती तर मोठे अनर्थ होण्याची शक्यता होती. वीज वितरण कंपनीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यालयात अग्निशमन यंत्रणा नसल्याचा धक्का दायक प्रकार समोर आला आहे. या कार्यालयातून पाच उपविभागीय कार्यालयाचा कार्यभार चालत असल्याने येथे अत्यंत महत्त्वाचे दस्त असतात. याशिवाय येथे अधिकारी-कर्मचारी संख्या मोठ्या प्रमाणावर असून ग्राहकांचे येणेजाणे सुद्धा असते. यामुळे या कार्यालयामध्ये अग्निशमन यंत्रणा असणे गरजेचे आहे. परंतु, या बाबीकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष आहे. नागरिकांच्या दक्षतेमुळे या अग्निकांडाचे भीषण स्वरूप वेळीच आटोक्यात आल्याने मोठी हानी टळली. 

विदर्भ तेढवा प्रकरणातील हल्लेखोरांचा वन्यप्राण्यांच्या तस्करीत हात?

रावणवाडी,दि.१३ :गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत येणाèया मरारटोला (तेढवा) येथील गणेशोत्सवादरम्यान गावकèयांवर हल्ला चढविणाèया आरोपींच्या स्कार्पिओ वाहनात वन्यप्राण्यांचे केस आढळल्याने ङ्कतेङ्क वन्यप्राण्यांची तस्करीत सहभागी असावे असा संशय पोलिसांना आल्याने वनविभागाच्या मदतीने वाहनातील वन्यप्राण्यांचे सात केस जप्त केले आहे.

बातमीदारः महेश येळे
 

समाजकल्याण विभागाचे लेखणीबंद आंदोलन

गोंदिया : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व विविध मागण्यांना घेवून सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने सोमवार(दि.१२) पासून लेखणीबंद आंदोलन सुरू केले. शासनाने नियुक्त केलेल्या एसआयटीला आणि त्यांच्या कारवाईला विरोध दर्शविण्यासोबतच इतर मागण्यांसाठी हे लेखणीबंद आंदोलन राज्यभर सुरू करण्यात आले आहे.

गोंदिया जिल्ह्यात होणार दोन हजार विहिरींचे बांधकाम-पालकमंत्री बडोले

गोंदिया,दि.१३: पूर्व विदर्भातील जिल्ह्यामध्ये शेततळ्यांना मिळालेला अल्प प्रतिसाद आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर शासनाने विहिरींचे कमी प्रमाण आणि पाण्याची पातळी लक्षात घेता शेततळ्यांऐवजी जास्तीत जास्त सिंचन विहिरी तयार करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारला झालेल्या नागपूर येथील आढावा बैठकित घेत ११ सप्टेंबरला त्यासंदर्भातील शासन आदेश जारी केला. यात नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ११ हजार विहिरी तयार करण्याचे लक्ष्य असून गोंदिया जिल्ह्यासाठी २ हजार विहिरीचे लक्ष्य ठेवण्यात आल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेसह तिघांना अटक

भंडारा दि.१३: गरीब कुटुंबातील मुलींना हेरून त्यांना पैशाचे प्रलोभण देऊन वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका महिलेसह तिघांना पोलिसांनी अटक केली. यात नागपूरच्या २१ वर्षीय युवतीसह एका इसमाचा समावेश आहे. ही कारवाई भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांच्या भरारी पथकाने सोमवारला दुपारी २ वाजता राजगोपालाचारी वॉर्डातील झोपडपट्टी वसाहतीत केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Monday 12 September 2016

नागपुरात पुन्हा गोळीबार

ऍट्रॉसीटी ऍक्टचे संरक्षण ओबीसी-बलुतेदार जातींनाही मिळावे!-प्रा. देवरेची मागणी




नाशिकः- ‘‘ दलित व आदिवासींवरील जातीय अन्याय अत्याचार रोखण्यासाठी ‘ऍट्रॉसिटी विरोधी कायदा’ करण्यात आला आहे. पुर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींच्या व आदिवासींच्या संरक्षणासाठी हा कायदा वापरण्यात येतो. परंतू गावगाड्यातील अस्पृश्य नसलेल्या न्हावी, धोबी, कुंभार, सुतार, पिंजारा, वडार, मनियार यासारख्या सर्व धर्मातील कनिष्ठ व अल्पसंख्य बलुतेदार-ओबीसी जातींवरही मोठ्या प्रमाणात जातीय अत्याचार होत असतात. म्हणून या जातींच्या संरक्षणासाठी ऍट्रॉसिटी ऍक्ट चा विस्तार करावा’’, अशी मागणी ओबीसी संघटनेचे अध्यक्ष प्रा. श्रावण देवरे यांनी आज एका पत्रकाद्वारे केली आहे.

पुराच्या पाण्यातूनच ते घराकडे निघाले

अमरावतीत पोलिसानेच केली जावयाची हत्या




अमरावती दि. 12 :- मुलीने मनाविरुद्ध जाऊन आंतरजातीय विवाह केल्याने संतापलेल्या पित्याने जावयाची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तुकाराम ढोकेला अटक केली आहे. ढोके हे वाशीममधील आसेगाव येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तब्बल चार महिन्यांनंतर पोलीसांना हत्येचे गूढ उकलण्यात यश आले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गोंदिया पर्यटन व सारस माहितीपटाचे विमोचन




गोंदिया दि. 12 : गोंदिया जिल्हयातील पर्यटनस्थळांवर आधारीत असलेल्या गोंदिया इसेन्स ऑफ इंडिया आणि राज्यात केवळ गोंदिया जिल्हयात आढळणाऱ्या दुर्मिळ अशा सारस पक्षावरील सारस वैभव गोंदियाचे या दोन्ही माहितीपटाचे विमोचन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते आज दीक्षाभूमी येथील सभागृहात नागपूर विभागातील विविध योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात तालूकास्तरीय आढावा सभेत करण्यात आले.

Sunday 11 September 2016

भंडारा जिल्हा विज्युक्टा जिल्हा कार्यकारिणीची सभा उत्साहात


भंडारा,(११ )—स्थानिक जे.एम.पटेल काॅलेज येथे आज सकाळी साडे अकराच्या सुमारास भंडारा जिल्हा विज्युक्टा जिल्हा कार्यकारिणीची सभा उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी विज्युक्टाचे जिल्हा अध्यक्ष प्रा.मार्तंड गायधने हे होते. केंद्रीय कार्यकारिणी सहसचिव प्रा.डाॅ ज्ञाननेश्वर गौपाले हेही प्रमुख्याने उपस्थित होते.

बोनससाठी आदिवासी मजूर झिजवितो वन विभागाचे उंबरठे

सन २०१४ च्या हंगामातील तेंदूपाने तोडणाऱ्या मजुरांना मिळालेले बोनस आपल्यालाही मिळावे, म्हणून तालुक्यातील एक आदिवासी मजूर गेल्या सहा महिन्यापासून वनविभागाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. परंतु, चिचगड येथील वनाधिकारी हे त्याला बोनसची रक्कम न देता देवरीच्या बँकेत चकरा मारायला लावत आहेत. परिणामी, वनाधिकाऱ्यांच्या चुकांची शिक्षा एका गरीब आदिवासीला का? असा आर्त प्रश्न त्या आदिवासी मजुराने सरकारला केला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे ओबीसी प्रेम पुन्हा उफाळले

नागरिकांनी एलईडी लाईटचा वापर करावा- आ. रहांगडाले

तेढवा येथे नागरिकांवर प्राणघातक हल्ला : पाच जणांना अटक

:शुक्रवारच्या रात्री ११ वाजता दरम्यान मरारटोला (तेढवा) येथे एकत्र गावकरी आल्याने आरोपींनी पिस्टलचा धाक दाखवित ठार करण्याची धमकी दिली. आरोपी गणीखान जब्बार खान (२९) रा. न्यू लक्ष्मीनगर गोंदिया, इमरान महफूज खान (२८) रा. टी.बी.टोली गोंदिया, बंदे शब्बीर खान (२४) रा. रेलटोली गोंदिया,राहूल सुनिल नेवारे (२४) रा. न्यू लक्ष्मीनगर गोंदिया व दुर्गेश लक्ष्मण विठोले (१९) रा. अंगुरबगीचा गोंदिया यांनी गावात दहशत पसरविल्याने रात्रभर गावात दहशतीचे वातावरण होते.

कुरखेडाच्या सती नदीला पूर

Saturday 10 September 2016

भारतीय भूमि भूकंपामुळे दरवर्षी पाच से.मी. वायव्य दिशेकडे सरकते- वाय.एस. चौधरी

भारतीय भूमि (प्लेट) भूकंपामुळे दरवर्षी पाच से.मी. वायव्य दिशेकडे सरकत आहे. या नैसर्गिकरित्या सरकणाऱ्या प्रक्रियेची नोंद जीपीएसच्या सहाय्याने केली जाते. यासह सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास केला जात असल्याचे माहिती, विज्ञान आणि तंत्रज्ञान तथा पृथ्वी विज्ञान राज्य मंत्री वाय.एस. चौधरी यांनी दिली.पावसाळी अधिवेशन काळात भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी भौगोलिक क्षेत्राशी संबंधित अतिशय महत्वपूर्ण प्रश्न विचारला. यावर केंद्रीय मंत्रालयाने लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

जनजागृती केल्यानंतरच व्यसनमुक्तीचा कायदा राबविणे शक्य: डॉ.अभय बंग



व्यसनमुक्तीसाठी शासनस्तरावर कडक कायदे करण्यात आले आहेत. मात्र लोकशिक्षणाद्वारे प्रबोधन करुन समाजजागृती केल्यानंतरच त्यासंबंधीचा निर्बंधात्मक कायदा राबविता येईल, असे प्रतिपादन ‘सर्च’चे संचालक डॉ.अभय बंग यांनी केले. तंबाखू व दारुमूक्त जिल्हा विकास कार्यक्रमांतर्गत सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा (ता.९) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली, यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

पतंजली फूड व हर्बल पार्कमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येणार- मुख्यमंत्री

एम बी पटेल महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा

बलात्कारानंतर अश्लील क्लिप, पीडितेवर चाकूहल्ला

कृषीसेवक सरळ सेवा पदभरती परीक्षेच्या निकालात घोळ

वसतिगृहातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

तेडवा रेती घाट पर तस्कर की दबगीर


एक देशी कट्टेसहित ४ तलवारे बरामद
     
 गाेदिया- रेती घाट टेडवा से दबगीर व ग्राम के नागरिको को धमकाकर गत कुछ माह से रेती की तस्करी  के विरुद्ध ग्राम टेडवा के नागरिकाे की शिकायत पर रावणवाडी पुलिस ने शुक्रवार की मध्यरात्री पश्चात मामला दर्ज किया।  रेती तस्कर गनी खान को पुलिसने हथियारो के साथ अपनी गिरप्त मे लिया।
जिला खनिकमं  विभाग से मिलीभगत के चलते तथा नागरिकाे को धमकाकर गनी खान व उसके साथी विगत कुछ माह से टेडवा रेती घाट से दिनरात अवैध उत्खनन कर लाखाे रुपयों के सरकारी राजस्व को चुना लगा रहा था।  ९ सितम्बर की रात को टेडवा गाँव के नागरिक ने बताया कि, रात्री समय आप रेती घाट से रेत भर कर चौपहीया वाहन गाँव से आवगमन करने की वजह से नागरिकों के स्वास्थ पर विपरीत परिणाम हो रहा है।  इसपर गनी खान व उसके साथियोंने तलवार व अन्य हथियार दिखाकर नागरिकों को धमकाना शुरू कर दिया। एक व्यक्ति के गर्दनपर तलवार लगा दी आैर कहा की रेती घाट के बारे मैं कुछ नहीं कहना। ग्राम के नागरिको ने इस घटना की शिकायत रावणवाडी पुलिस थाने मे की। गनी खान को हथियार के साथ गिरफ्तार कर लिया गया। गाँव के एक नागरिक ने अपना नाम गुप्त रखने की शर्त पर जानकारी देते हुए बताया कि, रेती घाट निलाम नहीं हाेने पर भी रेती तस्कर अपनी दबगीर कर रेती की तस्करी करते थे । इस संदर्भ में कई बार शिकायत करने के बावजूद  संबंधित विभाग  को कारवाई करने प र परहेज है। इस कारण तस्करो का हौसला बढकर टेडवा रेती घाट से रेती तस्करी नियमित हो रही थी तथा लोग रेती तस्कर की दबगीर से भयभीत रहते थे। आखिरकार ग्राम के नागरिकोने अपनी  एकजुटता का परिचय देते हुए इस दबगीर के विरुद्ध आवाज  बुलंद की।  अब देखना यह है कि, पुलिस व प्रशासन इस घटना को राेकने हेतू क्या कडे कदम उठाथा है। रावणवाडी थाना अधिकारी संजीव गावडे के मार्गदर्शन मे आगे की जांच शुरू है।  सूत्रो से मिली जानकारी अनुसार पुलिसने गनी खानसे बड़े पैमाने पर हथियार बरामद किए।                    

CM performs Ganesh Pooja with ostracised couple at his residence



Collector and SP to conduct enquiry into the social boycott


Mumbai, September 8

Hewalekar Couple was invited by Chief Minister Devendra Fadnavis at
his residence Varsha today to perform Ganesh Pooja. This couple from
Mahadev Wadi, Taluka Kudal of Sindhudurg District had come to
Mantralay following a social boycott by local residents. Responding
quickly to the grivances of Hewalekar family CM had ordered an enquiry
by district collector and Superintendent of Police.
Hewalekar family who is facing a social boycott was left with no other
option to leave their native place during the ongoing Ganesh Festival.
They arrived at Mantralay this Wednesday (September 7) carrying Ganesh
idol with them. CM Devendra Fadanvis responded the family and
instructed for the immediate accomodation the couple within hours. And
today CM specially invited the couple to his residence ‘Varsha’ and
performed Ganesh pooja with them. In addition to this CM has ordered
District Collector and Superintendent of Police to conduct an enquiry
into this issue of Social boycott.
Hewalekar couple has expressed their gratitude for the prompt response
and honor by the Chief minister himself.

Thursday 8 September 2016

नीती आयोग गांगरले; आरबीआयचे गर्व्हनर समजून स्वागत केले भलत्याचेच


रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) गर्व्हनर पदावरून रघुराम राजन पायउतार झाले. यानंतर दोन दिवसांपूर्वी उर्जित पटेल यांनी पदभार घेतला आहे. पटेल हे आपल्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या याच साधेपणामुळे नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांचा गैरसमज झाला आणि दुसऱ्याच व्यक्तीला उर्जित पटेल समजून त्यांचे त्याचे ‘स्वागत’ केले.

पाच हजाराची लाच स्विकारताना तांत्रिक अधिकारी जाळ्यात

गोंदिया जि.प च्या महिला व बालकल्याण सभापतींची हिटलरशाही

गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मासिक सभेत राष्ट्रवादीच्या महिला सदस्याने सभेच्या आयोजनावरून मुद्दा उपस्थित केल्याचा राग म्हणून सभापती विमल नागपुरे यांनी त्या सदस्याला सभागृहाबाहेर हाकलले. परिणामी, राष्ट्रवादीच्या महिला सदस्यांनी या प्रकरणाची तक्रार केल्याने जि.प. अध्यक्ष यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्नसुद्धा नागपुरे यांनी धुडकावून लावल्याने जि.प. परिसरात तणावाचे वातावरण पसरले.


कल्याण:PSI ला बुडवून मारण्याचा प्रयत्न


कल्याण - पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत असताना गणपती विसर्जनावेळी पोलिस उपनिरीक्षकास तलावात बुडवून मारण्याचा प्रयत्न झाला. कल्याण पूर्वेतील विसर्जन घाटावर मंगळवारी (ता. 6) रात्री घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तब्बल सात तासांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी सायंकाळी तिघांना अटक केली. चौथ्या संशयिताचा शोध सुरू आहे. स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांचे हे समर्थक असल्याचे बोलले जाते. मात्र, गायकवाड यांनी ते फेटाळले. 
(सदर विडिओ सोशियल मिडियावरून मिळाला आहे)

देवरीच्या शिवाजी विद्यालयात शिक्षक दिन साजरा


देवरी(ता.8)- स्थानिक छत्रपती शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात गेल्या मंगळवारी शिक्षक दिवस साजरा करण्यात आला.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मनोज भुरे हे होते. प्रमुख पाहूणे म्हणून जी.एम काशिवार, पी. एस खैरै आदी माान्यवर होते.
या प्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. दरम्यान मान्यवरांनी शिक्षक देिवसाचे महत्व उपस्थित विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.
प्रास्ताविक सुरेश मेश्राम यांनी केले. संचलन जान्हवी मुलतानी हिने केले. उपस्थितांचे आभार  निखिल नाकाडे यांनी मानले. यावेळी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday 6 September 2016

एलआयसीच्या मालमत्तेत 10 हजार कोटींची वाढ

आदिवासींच्या विकासाला बाधा ठरणाऱ्या शुक्राचार्यांवर कारवाई करा

एमपीएससीच्या परीक्षेत धापेवाड्याच्या किर्तीकुमार कटरे राज्यात दुसरा

अज्ञात ट्रकची दुचाकीस धडक, तीन ठार

ठाणेदार चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Monday 5 September 2016

दक्षिण आशियात केवळ एकच देश दहशतवादाला खतपाणी घालतोय, मोदींंची पाकवर टीका

शिक्षकदिनी मुख्याध्यापक कटरे यांचा सत्कार

अंत्यविधीसाठी पैसे नसल्याने कच-याच्या ढिगा-यात जाळला पत्नीचा मृतदेह

जिवंत असताना सर्व सुखसोयी अनुभवायच्या असतील तर पैसा अत्यंत गरजेचा असतो. खिशात पैसा नसेल तर आपली काहीच किंमत नसते, पण हाच पैसा मृत्यूनंतरही आपला पाठलाग सोडत नाही. असाच अनुभव देणारी एक घटना इंदोरपासून 275 किमी अंतरावर असणा-या रतनगड गावात घडली आहे. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी खिशात पैसे नसल्याने एका आदिवासी व्यक्तीला कच-याच्या ढिगा-यात मृतदेह जाळावा लागल्याची घटना घडली आहे.

Sunday 4 September 2016

हरितालिका पुजनाला गेलेल्या महिलांवर काळाची झडपः सहाचा मृत्यू



नागपूर- हरितालिकेचे पुजन करून सुखी संसाराची स्वप्ने बघणाऱ्या चार महिला व त्यांच्या समवेत तलावावर गेलेल्या दोन बालकांवर काळाने आज सकाळी 9 च्या सुमारास झडप घातली. ही घटना नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील सावंगी देवली येथे घडली. या घटनेनंतर गावात सर्वत्र शोककळा पसरली.
मृतांमध्ये मंदा नागोसे (45), प्रिया रामप्रसाद राऊत (17) जानव्ही ईश्वर  चोधरी (13) पूनम तुलशिराम डडमल (18) प्रणाली भगवान राऊत (16) व पूजा रतन डडमल (17) यांचा समावेश आहे.
 आज हरितालिका निमित्त पुजनाला सावंगी येथील महिला गेल्या त्या कायमच्या परत न येण्यासाठीच. सकाळीच आपापली घरकामे नित्याप्रमाणे आटोपून गावातील काही महिला व बालके हे मंगळागौरी निमित्त गावच्या तलावावर गेल्या. त्या महिलांसमवेत काही लहान बालके सुद्धा होती. तलावाच्या काठावर हरितालिकेचे पुजन सुरू असताना काही  महिला ह्या पाण्यात उतरल्या, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्या. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात इतर महिला व 2 बालकांचा  पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला.
ही वार्ता गावात पसरताच तलावावर एकच गर्दी उसळली. सकाळी दहा पर्यंत सर्व मृतदेह पाण्याबाहेर काढल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

राज्यातील वन अधिकाऱ्यांचे खांदेपालट

विद्यार्थ्यांनो समाजाचे विकासदुत बना- विशेष पोलिस महानिरीक्षक शिवाजी बोडखे

Prayas Panel scores impressive win in Jain Kalar Samaj elections



Nagpur: Prayas Panel scored an impressive victory in the elections held for new executive of Jain Kalar Samaj on Sunday. The elections, conducted after 12-year gap, saw drubbing of incumbent President Ravindra Durugkar and his panel. The results of the Sunday election were declared on Monday. Prayas Panel established its supremacy on the Central Executive and Nagpur District Committee of Jain Kalar Samaj.
Prayas Panel’s Anil Ahirkar was elected as President while Chandrashekhar Admane and Shashi Samarth bagged the posts of Vice President and Secretary respectively. Similarly, Ravikant Harde was elected President of Nagpur District Committee. On the other hand, the rival panel managed to win only two posts of life members. For District Executive, 5400 members exercised their franchise and for Central Executive poll, 7280 members voted to elect new office-bearers.
Prayas Panel, during its campaign, had highlighted financial irregularities indulged in by the rival incumbent panel as well as running the organization shabbily. The highlighting of the crucial issues to the hilt ultimately resulted in an impressive win for the Prayas Panel. Non-conduction of elections for new executive since the past 12 years was also raised to the hilt that turned the t
ables for the incumbent rival panel. The victorious panel showed its commitment to work for welfare of Jain Kalar Samaj honestly.

तहसीलदार रहांगडाले यांचा सेवानवृत्ती सत्कार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार;आरोपींना अटक

स्थायी समितीने फेटाळले मागील सभेचे ठराव व कार्यवृत्त

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शनिवारी ‘झेप.पी.’ म्हणजे खर्‍या अर्थाने झोलबा पाटलाचा वाडा असल्याचा प्रत्यय समितीच्या सर्व सदस्यांना आला. सभा सुरू झाल्यानंतर सुरूवातीला मागील सभेतील ठराव व कार्यवृत्ताला मंजुरी देणे गरजेचे असते. मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे सदस्यांना त्याची प्रतच उपलब्ध झाली नसल्याने सदस्यांनी ते मंजूर करण्यास ठाम नकार दिला.

दोषी डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. डॉ. संध्या डांगे यांच्या निष्काळजीपणामुळे महिलेला जीव गमवावा लागला. डॉ. डांगे यांची केवळ बदली न करता त्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी भाजप महिला पदाधिकार्‍यांनी तहसिलदारांमार्फत राज्याच्या आरोग्यमंत्र्याकडे निवेदन पाठविले आहे.

Saturday 3 September 2016

RBI की 'ना' कहने की क्षमता की रक्षा करना जरूरी: रघुराम राजन





नई दिल्ली-आरबीआई गवर्नर के रूप में कार्यकाल खत्म होने के 2 दिन पहले अपने अंतिम भाषण में निवर्तमान आरबीआई गवर्नर रघुराम राजन ने कहा है कि सरकार के सर्वोच्च नेताओं को 'ना' कहने की आरबीआई की क्षमता को बचाकर रखना होगा। उन्होंने कहा कि देश को एक मजबूत और स्वतंत्र केन्द्रीय बैंक की आवश्यकता है और इसके लिए ऐसा करना बहुत जरूरी है।

सेंट स्टीफन कॉलेज में 'इंडिपेंडेंस ऑफ द सेंट्रल बैंक' विषय पर भाषण देते हुए राजन ने कहा कि रिजर्व बैंक को सरकार द्वारा तय एक ढांचे के तहत काम करना है और वह सभी बाध्यताओं से मुक्त नहीं हो सकता। सरकार के साथ नीतिगत मतभेद पर अपने पूर्ववर्ती डी सुब्बाराव के बयान को दोहराते हुए राजन ने कहा, 'हमें थोड़ा सा और आगे जाना होगा और रिजर्व बैंक सिर्फ दिखावे के लिए नहीं है इसलिए रिजर्व बैंक के पास ना कहने का अधिकार है और आगे भी रिजर्व बैंक के इस अधिकार को संरक्षण मिलना चाहिए।' राजन ने कहा कि भारत को वृहद आर्थिक स्थायित्व के लिये मजबूत और स्वतंत्र रिजर्व बैंक की आवश्यकता है, जो कि सर्वाधिक महत्वपूर्ण है।

राजन ने यह भी कहा कि रिजर्व बैंक द्वारा अपने लाभ में से सरकार को विशेष लाभांश देने से बजट की समस्या दूर करने में मदद नहीं मिलेगी। उन्होंने कहा कि जी-20 सम्मेलनों में वित्तमंत्रियों के साथ रिजर्व बैंक के गवर्नर भी बैठते हैं। राजन ने कहा, 'उनके वहां बैठने का एक कारण होता है। वे रिजर्व बैंक के गवर्नर होते हैं ना कि अन्य नियामकों या सरकार के सचिवों की तरह, जो सरकार के इशारे पर काम करते हों।' उन्होंने कहा कि आरबीआई गवर्नर को इतनी स्वतंत्रता होनी चाहिए कि वह देश के सबसे शक्तिशाली व्यक्ति से भी असहमति दर्ज करा सके। उन्होंने यह भी कहा कि रिजर्व बैंक के पास परिचालन संबंधी निर्णय लेने का भी अधिकार होना चाहिए।

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...