Friday 4 January 2019

सामाजिक ऐक्य ही काळाची गरज- संजय जायस्वाल

 देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात

देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थितीवर अवलंबून असते. जो समाज या क्षेत्रात अग्रेसर असेल त्या समाजाचा सर्वच क्षेत्रात दरारा असतो. आपल्या समाजाची प्रगती साधायची असेल तर वेगवेगळ्या गटात विखुरलेल्या समाजाला एकसंघ करावे लागेल. सामाजिक ऐक्य ही खरी काळाची गरज आहे. यासाठी सर्व समाजधुरिणांची ठोस पावले उचलावी, असे आवाहन रायपूर येथील भारतीय कलचुरी जायस्वाल समवर्गीय महासभेचे राष्ट्रीय संरक्षक संजय जायस्वाल यांनी गेल्या रविवारी (दि.30) देवरी येथे आयोजित सर्ववर्गीय कलार समाज संमेलनात केले.
स्थानिक धुकेश्वरी मंदीर परिसरात आयोजित कलारसमाज संमेलानात ते अघ्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मंचावर गोंदियाचे श्याम चंदनकर, सुप्रसिद्ध साहित्यीक राम महाजन, फाल्गुन उके, रायपूर येथील घनशाम मेश्राम,डॉ. अनिल चौरागडे, रतनलाल बावनथडे, चनीराम मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. चौरागडे यांनी केले. दरम्यान, दुलीचंद मेश्राम,श्वेता चंदनकर, विद्या मेश्राम यांचेसह गुणवंत विद्यार्थी आणि ज्येष्ठ समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...