Saturday 19 January 2019

सरकारने 50 लाख कर्मचाऱ्यांना हरताळ फासला- विष्णू आडे

बीड,दि.19   :  महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन  हक्क संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात जुनी पेंशन योजना लागु करावी, या मागणीसाठी  राज्यातील मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर येत्या २७ जानेवारी रोजी हल्लाबोल आंदोलन आयोजित करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षापासुन सुरू असलेल्या जुनी पेंशन लढ्याला शासनाकडून कशलीही भीक घालण्यात आली नाही. राज्यातील मजबूत संघटन बांधणीच्या जोरावर आजवर नागपूर, मुंबई येथे भव्य राज्यव्यापी आंदोलने करण्यात आले. परंतु, राज्यातील देवेंद्र सरकारने सुमारे ५० लाख कर्मचाऱ्यांच्या तोंडाला हरताळ फासला आहे, असा आरोप बीड जिल्हाध्यक्ष विष्णु आहे यांनी केला आहे.
 पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी जो जुनी पेंशन देण्याच्या मनस्थितीत असेल त्यांचाच आपण २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विचार यापुढे करायचा म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांनी पेंशन नाही, तर मत सुद्धा नाही ही मोहीम सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या २७ जानेवारी २०१९ ला जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि मंत्र्यांच्या बंगल्यावर हल्लाबोल आंदोलनही करण्यात येणार आहे. नवीन पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना सुरू करावी या.मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.
 आजपर्यंत हजारो डीसीपीएस,एनपीएस धारक कर्मचारी सेवेत असताना मरण पावले, परंतु त्यांच्या वारसाला कसलीही अर्थिक मदत मिळाली नाही, त्यांच्या कुटुंबाला शासनाने वाऱ्यावर सोडल्याची भावना आहे.अशा कुटुंबाना फँमिली पेंशन ,ग्र्याच्युटी लागु करावी. एकीकडे आणिबाणीत कारावास भोगलेल्याना पेंशन ,लोकप्रतिनीधींना पेंशन आणि  मुळात जुनी पेंशन ही त्या कर्मचाऱ्यांने आयुष्यभर केलेल्या सेवेचं उतारवयात मिळणारं फळ असताना तो नाकारण्याचा खरच शासनाला अधिकार आहे का ?  शासनाला आपली जबाबदारी झटकून चालणार नाही, तर सरसकट कर्मचाऱ्यांच्या हक्काची जुनी पेंशन योजना सुरू करावी अशी कर्मचाऱ्यांची भावना आहे.
 अन्यायकारक  नवीन पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना सुरू करावी या मागणीसाठी या लढ्यात ,या आंदोलनात सहभागी होऊन जुनी पेंशनचा लढा तीव्र करावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष विष्णु आडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...