Wednesday, 8 May 2019
लाखनीतील कुणबी समाज सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळ्यात १७ जोडपी विवाहबद्ध
Tuesday, 7 May 2019
लग्नातील आहेराचे पैसे दिले पाणी फाऊंडेशनच्या श्रमदानासाठी
Monday, 6 May 2019
रामपायली परिसरात रानगव्याचा मृत्यू
गोंदिया,दि.06ः- नागझिरा- नवेगाव काॅरीडोर मधील जांभळी – शशिकरण पहाडी परिसरातील रामपायली भागात कम्पार्टेमेंट नंबर ५०९ मध्ये एप्रिलमध्ये १ गवा मृतावस्थेत आढळल्यानंतर परत काल रविवारला(दि.५) रामपायली परिसरात १ गवा उष्णघातामुळे मृतावस्थेत आढळून आल्याने गव्यांच्या मृत्यूंची श्रृंखला सुरु होण्याची भिती सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी बेरार टाईम्सकडे व्यक्त केली आहे.गेल्या वर्षी २०१८ मधे एप्रिल ते मे महिन्यामध्ये जवळपास ८ -९ गवे मृतावस्थेत मिळाली होती.रानगव्यांच्या लागोपाठ होणार्या मृत्यूचे कारण काय असू शकते हे अद्यापही स्प्ष्ट झालेले नाही.तर उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची भटकंती होत असल्याने आणि जंगलात गुरेचराईचे प्रमाण वाढल्याने अन्न व चाऱ्यासाठी स्पर्धा वाढू लागल्याचेही बहेकार यांचे म्हणने आहे.त्यातच्या जांभळी – शेंडा – शशिकरण हा जंगलभाग नागझिरा नवेगाव काॅरीडोर मध्ये असला तरी बहुतांश जंगल हे FDCM कडे आहे. एफडीसीएमद्वारे व्यवस्थापनाच्या नावावर होत असलेली जंगल कटाई व त्यामुळे सर्वत्र जंगलभर झालेली मानवी ढळवाढवळ वन्यप्राण्यांना धोकादायक ठरु लागल्याचे समोर येऊ लागले आहे.
ज्या भागात रानगव्याच्या मृत्यू झालेला आहे,त्या भागात वाघ , बिबट, अस्वल, रानगवा,रानकुत्री,भेकळ,चितळ,सांभर,चांदी अस्वल असे अनेक महत्त्वाचे वन्यजिव ह्या परिसरात आहेत, त्यामुळे हे जंगलभाग अत्यंत महत्त्वाचे आहे.रामपायली परिसरात मृतावस्थेत आढळलेल्या रानगव्यांच्या निरिक्षणानंतर अतिउष्माघाताने व वेळेवर पाणी मिळत नसल्याने त्यांचा मृत्यू होत असल्याचे बहेकार यांनी म्हटले आहे.
समाजकल्याणच्या इमारतीवरून पडून विद्यार्थीनी गंभीर

Wednesday, 1 May 2019
नागपूर जिल्हा परिषद आरक्षण सोडत : प्रस्थापितांना धक्का
नागपूर,दि.01 :निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २०१६ आणि २०१८ मध्ये जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. आता पुन्हा तिसऱ्यांदा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात अपवाद वगळता प्रस्थापितांचे मतदारसंघ आरक्षणात बाद झाल्याने त्यांना धक्का बसला आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांच्या उपस्थितीत बचत भवन येथे आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पाडली. शाळकरी मुलाच्या हाताने चिठ्ठ्या काढण्यात आल्या. जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समित्यांचे आरक्षणही तालुकास्तरावर काढण्यात आले.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच कोराडी व खापरखेडा दोन नगर परिषदांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीला न्यायालयात आव्हान दिले जाईल. निवडणुका पुन्हा लांबणीवर पडतील, अशी जि.प.मध्ये उलटसुलट चर्चा आहे
नक्षल्यांच्या भूसुरुंगस्फोटात १५ जवान शहीद झाल्याची भिती
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया,दि.२१ : स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे, तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करुन स्त्रियांचे मोठ्या ...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...



