Sunday 28 March 2021

निलज ते सिंदपुरी मार्ग झाला मृत्युचा सापडा

पवनी : निलज ते करधा या रस्ता बांधकामाला आता सुमारे 3 वर्ष होत आहेत परंतु अजुन पर्यंत काम पूर्ण झाला नाही. गेले कित्येक वर्षापासून निलज ते सिंदपुरी पर्यंत खड्डे आहेत आता काही ठिकानी बांधकाम सुरु आहे तर काही ठिकानी माती टाकून ठेवली परंतु अजुन पर्यंत कामाला सुरुवात केली नाही आहे. याचाच एक उदाहरण म्हणजे पवनी पुल पासून ते न.प. महाविद्यालय पवनी पर्यंत चा रोड  या ठिकानी माती च भरण टाकून सहा महीने लोटून गेले परंतु अजून पर्यंत या ठिकानी काम केल नाही यामुळे रोडवरून येणे- जाण्याऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे अपघाताला आमंत्रण देण्याचे काम या रोडवर दिसते. माती टाकून ठेवल्यामुळे धूळ चे प्रमाण वाढले व नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. स्वतःचे आयोग्य धोक्यात घालून या रोडवरुन जावे लागते तर त्या ठिकानी असलेल्या दूकान घरां मध्ये धूळ जाते यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. काही दिवसा अगोदर धुळ चे प्रमाण अतिशय वाढल्या मुळे नागरिकांना रोडवर उतरून आंदोलन देखील केले याचा परिणाम अस झाल की रोज सकाळ सायंकाळ या रोडवर पाणी मारल्या जाते. परंतु काम अजुन पर्यंत सुरु केले नाही. अर्धवट काम करून सोडल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे व आपघाताला सामोरे जावे लागत आहे. पवनी च्या आत सुद्धा काम सुरु आहे गावाचा आत पन धूळ आणि बाहेर तर अति धूळ यामुळे नागरिकांचा आरोग्याचा घोका निर्माण झाला आहे. पवनी च्या पुलावर खुप खड्डे व पुलाचा दोन्ही बाजूला माती जमा झाली आहे यामुळे अपघाताला आमंत्रण देण्याचे काम येथे दिसून येते. 

  आता पर्यंत निलज ते सिंदपुरी रोडवर सन 2019 ते 23 मार्च 2021 पर्यंत पवनी पोलिस स्टेशन मध्ये नोंद असल्या प्रामाणे एकूण 16 अपघात झाले त्यापैकी 09 मृत्यु तर 08 जखमी झाले याप्रमाणे 56.25% मृत्यु दर आहे.

नितीन गडकरी यांनी कित्येकदा सांगितले आहे की एकाद्या ठिकाणी वारंवार अपघात होत असतील तर त्याला black स्पॉट घोषित करून तेथे बदल करावा परंतु इतके अपघात होऊन व मृत्यू होऊन प्रशासन झोपले आहे. अपघाताचे कारण काय तेथे तांत्रिक चूका काय आहेत याचे विश्लेषण करण्याची तसदी सुद्धा संबंधीत अधिकारी घेत नसतील तर नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे असं म्हणावं लागेल. 

 नागरिकांचा जीव कवळीमोल समजू नये जर नागरिक कर भरून चांगल्या सोयी सुविधाच्या अपेक्षा करत असताना प्रशासन नागरिकांना मृत्यू देत असेल तर संविधानाने दिलेल्या सन्मानाणे व कुणाला न घाबरता जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. येणाऱ्या दिवसात ही भयावह परिस्थिती आणि अधिकाऱ्यांची बेपरवाही माननीय नितीन गडकरी यांच्या समोर मांडण्यात येईल व त्यांनी याकडे लक्ष घालून लवकरात लवकर योग्य ते नियोजन करून नागरिकांचे जाणारे नाहक प्राण वाचवावे व दिरंगाई करणाऱ्यांवर योग्य ती कारवाही करावी ही विनंती करण्यात येईल.

 यानंतर अपघातात कुणाचा मृत्यु झाला किंवा अपंगत्व आले तर संबंधित अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा याची मागणी करण्यात येईल त्यासाठी न्यायालयातून न्याय मागण्यात येईल असा इशारा योगेश बावनकर यांनी दिला आहे.


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...