देशात कोविडच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
नवीदिल्ली, दि.14- कोविड-19च्या झापाट्याने होणारा प्रसारामुळे देशात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. दीड लाखांहून अधिक रुग्ण संख्या सापडत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी देशभरात लॉकडाऊन लावण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्रात आधीच संचारबंदीची घोषणा झाली आहे, तर अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर लॉकडाऊनसारखे निर्बंध लावण्यात आळे आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी तसे सूचक संकेत दिले आहेत.
सीतारमण यांचेप्रमाणे, देशात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरत असली तरी व्यापक पातळीवर लॉकडाऊन करण्याचा केंद्राचा कुठलाही इरादा नाही. लॉकडाऊन केल्याने देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प होण्याची शक्यता आहे. परिणामी, गतवर्षी प्रमाणे लॉकडाऊन होणार नाही. असे असले तरीही साथरोग रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर कठोर पावले उचलण्यात येतील..
अर्थमंत्रालयाने ट्वीटच्या माध्यमातून म्हटले आहे की, साथीला रोखण्यासाठी पाच सूत्री रणनीती आखण्यात आली आहे. यामध्ये तपासणी, माहिती संकलित करणे,उपचार करणे, सलीकरण आणि संक्रमण रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या माहितीचे विवरण केले आहे.
देशात दुसरी लाट झपाट्याने पसरत असून अनेक राज्यात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. यात महाराष्ट्र, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश, आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. गेल्या 24 तासात तब्बल 1 लाख 14 हजारावर रुग्ण आढळले आहेत. तर मृतांचा आकडेवारीने सु
द्धा हजारी ओलांडली आहे.
No comments:
Post a Comment