Tuesday, 2 May 2017

४०० कोटींचा तूरडाळ घोटाळा होईपर्यंत सरकार झोपले होते काय ? - उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 2 - महाराष्ट्रात ‘तूरडाळ’ घोटाळा झाला आहे काय? कारण ४०० कोटींचा डाळ घोटाळा झाल्याची कबुली स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच दिली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार नसून पारदर्शक असे भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे तूरडाळ घोटाळ्याचे खापर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीवर फोडता येणार नाही. ४०० कोटींचा घोटाळा होईपर्यंत सरकार झोपले होते काय ?  असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. 
 
आजच्या सामनाच्या अग्रलेखातून त्यांनी  आपल्याच सरकारला सुनावले आहे. ४०० कोटी हा सरकारी आकडा आहे. हा आकडा ७००-८०० कोटींपर्यंत सहज असू शकतो. तूरडाळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांवर माती खायची वेळ आली आहे. तूरडाळीचे उत्पादन जास्त झाले, त्यामुळे भाव कोसळले. हे नेहमीचेच उत्तर आहे. मुळात सरकार बदलले तरी शेतकऱ्यांबाबतचे धोरण आणि नियोजन साफ फसले आहे अशी टीका उद्धव यांनी केली आहे. 
 
शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज नसल्यामुळे हे सर्व घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आता दिली आहे ठीक आहे, शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज आला नाही आणि मुख्यमंत्र्यांना सरकारी केंद्रावरील व्यापाऱ्यांच्या तूरडाळ घोटाळ्याचा अंदाज आला नाही. सरकार मस्त मजेत आणि खुशीत आहे व शेतकरी मात्र पानिपत झाल्यासारखा कोसळला आहे असे अग्रलेखात म्हटले आहे. 
 

Monday, 1 May 2017

देवरी येथे महाराष्ट्र दिनी चिमुकल्यांनी केले ध्वजारोहण




देवरी, ०१ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील आईएसओ मानांकन प्राप्त ब्लॉसम पब्लिक स्कूल मध्ये चिमुकल्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
देवरी तालुक्यातील एकमेव आयएसओ मानांकन प्राप्त पब्लिक शाळा ही नवनवे उपक्रम राबविण्यासाठी ओळखली जाते. आज महाराष्ट्र दिनी आपल्याच शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करीत आपली परंपरा क़ायम ठेवतमुख्याध्यापक सुजित टेटे यांनी चिमुकल्याच्या हातानी ध्वजारोहण करुनघेतला.
आराध्या कानतोडे आणि मिहीर काशिवार अशी ध्वजारोहण करणाऱ्या बालकांची नावेआहेत. या उफक्रमाचे समाजाच्या सर्वच स्तरातून याचे कौतुक केले जात आहे. सदर संकल्पना राबविण्याचे श्रेय मुख्याध्यापक सुजित टेटे यांना दिले जात आहे.

युवाओ के सपनों का महाराष्ट्र बनायेंगे- मुख्यमंत्री फडणवीस


 
ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र में फडणवीस, रतन टाटा और अक्षय कुमार का छात्रों से संवाद
मुंबई, 1 (प्रतिनिधी)- देश के विकास में युवा वर्ग की भूमिका सुनिश्चित करने की दिशा में महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज ऐतिहासिक कदम उठाया। महाराष्ट्र दिवस पर मुख्यमंत्री ने युवा वर्ग द्वारा सूचित किए गए विकास प्रस्तावों पर प्रदेश के विकास की नई धारा तय करने का वादा किया। इसके साथ ही महाराष्ट्र देश में पहले राज्य के रूप में अंकित हो गया, जहां नई पीढ़ी के सुझावों पर राज्य के विकास का एजेंडा तय किया जा रहा है। मुख्यमंत्री फडणवीस ने विख्यात उद्योगपति रतन टाटा, फिल्म अभिनेता अक्षय कुमार, मेजर जनरल अनुज माथुर, वरिष्ठ विधायक मंगल प्रभात लोढ़ा के साथ ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ का विमोचन हुए कहा कि प्रदेश के विकास लिए यह अभिनव शुरूआत है, जिसके तहत युवा शक्ति की संकल्पना के मुताबिक महाराष्ट्र विजन 2025 की शुरूआत हो रही है। इस मौके पर करीबल 10 हजार छात्रों के साथ मुख्यमंत्री, रतन टाटा, अक्षय कुमार एवं अन्य सभी अतिथियों ने प्रदेश के विकास की शपथ ली।
वरली स्थित एनएससीआइ स्टोडियम में आयोजित ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’  में समस्त महाराष्ट्र से आए करीब 10 हजार छात्रों के बीच मुख्यमंत्री ने वादा किया कि युवा वर्ग में शौर्य, ज्ञान, भक्ति एवं शक्ति का संचार करके नव महाराष्ट्र का निर्माण करते हुए महाराष्ट्र में युवा पीढ़ी की संकल्पना को मजबूत करके महाराष्ट्र को विकास को पथ पर आगे बढ़ाने का काम सरकार करेगी।  ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ में महाराष्ट्र के 6 लाख युवकों की सहभागिता के बीच 12500 छात्रों से हुई बातचीत में से 2300 छात्रों द्वारा सूचित किए गए चुनिंदा 11 विषयों पर महाराष्ट्र के विकास की संकल्पना पेश की गई। मुख्यमंत्री ने कहा कि छात्रों के ये सुझाव मनहाराष्ट्र की दशा और दिशा बदलने में कामयाब होंगे। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के न्यू ढंजिया के स्वप्न को साकार करने के बारे में महाराष्ट् से काफी उम्मीदें है। जिसके लिए प्रदेश पूरी तरह से तैयार है। उन्होंने कैप्टन अमोल यादव द्वारा निर्मित हवाई जहाज की तारीफ करते हुए कहा कि व्यावसायिक उड़ान की इजाजत के बाद भारत में बना यह एयरक्राफ्ट आकाश में उडता दिखेगा।
विख्यात उद्योगपति रतन टाटा, अभिनेता अक्षयकुमार और वरिष्ठ विधायक मंगल प्रभात लोढ़ा की उपस्थिति में मुख्यमंत्री ने कहा कि युवा पीढ़ी के लिए ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र एक महत्वपूर्ण मंच के रूप में उभरा है। उन्होंने कहा किट्रान्सफॉर्म महाराष्ट्र के लिए एक स्वतंत्र टीम काम करेगी। इस अवसर पर मुख्यमंत्री के अलावा रतन टाटा एवं अक्षय कुमार ने भी सोशल मीडिया के माध्यम से भेजे गए छात्रों के महाराष्ट्र के विकास से संबद्ध सवालों के जवाब दिए।

दहशतवाद्यांच दरोड्याच्या प्रयत्नः पाच पोलिस शहिद

श्रीनगर,दि01 (वृत्तसंस्था) : दक्षिण काश्‍मीरमधील कुलगाममध्ये बॅंकेची रोख रक्कम घेऊन जाणारी गाडी अडवून लुटण्याच्या दहशतवाद्यांच्या प्रयत्नांत किमान पाच पोलिस आणि दोन सुरक्षा रक्षक ठार झाले. या पोलिसांच्या हौतात्म्यामुळे दहशतवाद्यांचा कट उधळला गेला.
बॅंकेच्या निहमा गावातील शाखेमध्ये पैसे भरून ही गाडी पुन्हा कुलगामकडे येत असताना दहशतवाद्यांनी त्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी गाडीवर आणि सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. यात पाच पोलिस हुतात्मा झाले. गोळीबारात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीमही हाती घेण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी पोलिसांची शस्त्रे पळविली.
गेल्या 24 तासांत भारतीय सुरक्षा दलांवर हल्ला होण्याची ही दुसरी वेळ आहे. प्रत्यक्ष ताबारेषेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान हुतात्मा झाले. त्यानंतर बॅंकेची रक्कम लुटण्याच्या प्रयत्नांत असलेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पोलिस हुतात्मा झाले.
‘गेले 24 तास जम्मू-काश्‍मीसाठी भयानक होते. आधी दोन जवान हुतात्मा झाले आणि त्यांच्या मृतदेहाची विटंबना झाली. त्यानंतर आता पाच पोलिस आणि बॅंकेच्या दोन कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला,’ असे ट्‌विट जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले. गेल्या काही वर्षांपासून दक्षिण काश्‍मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. पोलिसांवरील या हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी गटाने स्वीकारली नाही.

मतदारांना पैसे वाटप केल्यास उमेदवारावर पाच वर्षांची बंदी

नवी दिल्ली, दि. 1 - मतदारांना पैसे देऊन मतं मागणा-या उमेदवारांवर बंदी आणण्याची योजना निवडणूक आयोगाकडून आखली जात आहे. निवडणूक आयोग यासंबंधी केंद्र सरकारला पत्र लिहण्याचा विचार करत आहे. मतदारांना पैसे दिल्याचा आरोपाखाली ज्या उमेदवारांवर चार्जशीट दाखल करण्यात आली आहे, त्यांच्यावर किमान पाच वर्षांसाठी बंदी आणण्यात यावी असं निवडणूक आयोगाकडून सरकारला सुचवण्यात येणार आहे.
 
निवडणूक आयोग कायदा मंत्रालयाशी संपर्क साधत रिप्रेझेंटेशन ऑफ पिपल्स अॅक्टमध्ये बदल करण्याची शिफारस करणार आहे. यानंतर ज्या उमेदवारांविरोधात मतदारांना पैसेवाटप केल्याचा आरोपाखाली चार्जशीट दाखल आहे, त्यांना पुढील पाच वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढता येणार नाही. निवडणुकीत लाच देणे किंवा प्रस्ताव रखणे यासंबंधी निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. गतवर्षीपासून ते आतापर्यंत तामिळनाडूमध्ये तीन निवडणुका याच मुद्यावर रद्द करण्यात आल्या आहेत. या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी मतदारांना पैसे वाटून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. त्यानंतर निवडणुकाच रद्द करण्यात आल्या. 
 
नुकतंच निवडणूक आयोगाने तामिळनाडूमधील आर के नगर विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारांना पैसे वाटप होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर निवडणुकीवर स्थगिती आणली होती. 12 एप्रिल रोजी ही पोटनिवडणूक होणार होती. माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. राजकीय पक्ष टोकन, दूष, प्रीपेड फोन रिचार्ज कूपनच्या माध्यमातून पैसे वाटप करत मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाला मिळाल्या होत्या. त्यानंतर या निवडणुकीवर स्थगिती आणण्यात आली.

आश्चर्यम् ! SBI एटीएममधून निघालेल्या 500च्या नोटांवरून गांधी गायब



नवी दिल्ली, दि. 30 - नोटाबंदीनंतर अनेकदा एटीएममधून बनावट नोटा बाहेर आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सध्या तरी असे प्रकार थांबल्याचं दिसत असतानाच असाच एक प्रकार मध्य प्रदेशमध्ये घडला आहे. मोरेना जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका एटीएममधून गांधींचा फोटो नसलेल्या 500च्या नोटा बाहेर आल्या आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शनिवारी मोरेनामध्ये एक व्यक्ती पैसे काढण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमजवळ पोहोचले. जेव्हा त्यांनी एटीएममधून पैसे काढले तेव्हा 500च्या नोटा एटीएममधून बाहेर आल्या. मात्र नोट पाहून ती व्यक्ती आश्चर्यचकित झाली. जी नोट एटीएममधून आली त्यावर नंबर होते. मात्र एटीएममधून निघालेल्या नोटांवरून गांधीजींचे फोटो गायब होते. एटीएममधून बाहेर आलेल्या 500च्या चार नोटांवरून चक्क गांधीजींचे फोटो नसल्याचंही पाहून आजूबाजूचे लोकही अचंबित झाले. त्यामुळे एटीएम असलेल्या परिसरात एकच खळबळ उडाली.
मात्र यानंतर याची तक्रार बँकेकडे करण्यात आली आहे. बँक प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. गांधीजींचा फोटो नसलेल्या नोटा एटीएममध्ये कशा याला याचा बँकेचे कर्मचारी शोध घेत आहेत. याआधीही मध्य प्रदेशमधल्या दमोह जिल्ह्यात असा प्रकार समोर आला आहे. त्यावेळीही एटीएममधून नंबर नसलेल्या 500च्या नोटा बाहेर आल्या होत्या. नंबर नसलेल्या या नोटाही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून बाहेर आल्या होत्या. त्यानंतर ती एटीएम मशिन बंद करण्यात आलं होतं.

सिमेंट कंपन्यांना गडकरींचा इशारा




नागपूर - उत्पादनावर नफा कमावण्यास आपली मनाई नाही; मात्र साखळी करून ग्राहकांची लुटमार केली जात असेल, ग्राहकांना ब्लॅकमेल केले जात असेल, तर खपवून घेणार नाही. सिमेंटच्या किमतीत शंभर रुपयांनी वाढ केल्यास अशा कंपन्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज दिला.


'देशभरातील सिमेंट रस्त्यांच्या जाळ्यांमुळेच सिमेंट कंपन्यांना पुनरुज्जीवन मिळाले. आता मागणी वाढताच काही कंपन्यांनी भाव वाढवून फायदा घेण्याचे ठरविले आहे; मात्र आपण तसे होऊ देणार नाही. अशा कंपन्यांचा शोध घेऊ त्यांना ठोकून काढू. एवढेच नव्हे तर बंद पडलेल्या सिमेंट कंपन्या पुन्हा सुरू करू. शंभर रुपयात सिमेंटचे पोते विकून कंपन्यांची मक्तेदारी मोडून काढली जाईल,'' असा इशारा गडकरी यांनी दिला.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...