Tuesday, 22 August 2017

पतंजलीला टक्कर देण्यासाठी श्री श्री झाली सज्ज


 मुंबई,22- अल्पावधीतच विस्तार पावलेल्या योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीला बाजारात टक्कर देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांची 'श्री श्री आयुर्वेद' (एसएसए) कंपनी सज्ज झाली आहे. उत्पादनांच्या विक्रीसाठी 'श्री श्री आयुर्वेद' कंपनीने एक हजारहून अधिक दुकाने उघडण्याची तयारी केली असून सुरुवातीला टूथपेस्ट, डिटर्जंट, तूप आणि बिस्कीट्स ही उत्पादनं विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

'नागरिकांच्या दैनंदिन जीवनात आयुर्वेदिक उत्पादनांचा वापर वाढला आहे. आमचा ब्रॅण्ड हा अन्य कंपन्यांपेक्षा वेगळा असेल. 'श्री श्री आयुर्वेद' (एसएसए) 'श्री श्री तत्व' ही ब्रॅण्ड स्टोअर उघडणार आहे. २००३मध्ये या कंपनीने हेल्थ ड्रिंक्स, साबण आणि मसाले अशी उत्पादनं आणली होती. आता फक्त मॉडर्न रीटेल स्टोअर्स उघण्यात येतील. यासोबत ऑनलाइन विक्रीही कंपनी सुरू करणार आहे. तसंच कंपनी ३०० हून अधिक नवी उत्पादनं बाजारात आणणार आहे. आयुर्वेदिक मार्केट वाढवणं हेच आमच ध्येय आहे. आम्हाला कोणासोबत स्पर्धा करायची नाही आहे. 'श्री श्री तत्व'चे स्टोअर्स पतंजली स्टोअर्सच्या जवळपास असतील', असं 'श्री श्री आयुर्वेद' (एसएसए) ट्रस्ट चे मुख्य कार्यकारी अधिकारी तेज कटपिटिया यांनी सांगितलं.

'श्री श्री तत्व'चे पहिले स्टोअर हे पुढच्या महिन्यात उघडणार आहे. याचबरोबर नोव्हेंबरपर्यंत ५० स्टोअर्स उघडण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं फ्रेंचाइज इंडिया होल्डिंग्सचे प्रमुख गौरव मार्या यांनी सांगितलं. पतंजली कंपनीने फार कमी वेळात भारतीय बाजारपेठेत स्वताःचं स्थान निर्माण केलं आहे. पतंजलीमुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांना हर्बल सेक्टरकडे लक्ष देण्यास भाग पाडलं आहे.

राज्यातील 114 ग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबर रोजी मतदान

मुंबई, दि. 22- राज्यातील ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी तारीख निश्चित झाली आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या अशा 114 ग्रामपंचायतींसाठी  23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी याबाबत घोषणा केली. 
संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात अचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांसाठी 4 ते 8 सप्टेंबर 2017 या कालावधीत सुट्टीचा दिवस वगळून नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. 13 सप्टेंबर 2017 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. 23 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. गडचिरोली जिल्ह्यात मात्र दुपारी 3.00 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. यानंतर सर्व ठिकाणची मतमोजणी 25 सप्टेंबर 2017 रोजी होईल, अशी माहिती  राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.
कोणत्या ग्राामपंचायतींमध्ये होणार मतदान-
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी:
 पालघर- 8, नाशिक- 22, नंदुरबार- 1, अहमदनगर- 8, पुणे- 1, औरंगाबाद- 4, नांदेड- 4, उस्मानाबाद- 1, जालना- 40, हिंगोली- 13, यवतमाळ- 7, चंद्रपूर- 4 आणि गडचिरोली- 1. एकूण- 114. 

सरपंचपदाच्या उमेदवारांसाठी सदस्यसंख्येनुसार 50 ते 1 लाख 75 हजार रुपयांपर्यंत खर्च मर्यादा

Mantralay1-580x395गोंदिया,दि.22 : ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचपदाच्या निवडणुकीत उमेदवारांसाठी खर्च मर्यादा निवडणूक आयोगाने निश्चित केली आहे.ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या उमेदवारांसाठी सदस्यसंख्येनुसार 50 हजार रुपये ते 1 लाख 75 हजार रुपयांपर्यंत खर्च मर्यादा ठेवण्यात आली आहे.ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाचे उमेदवार निवडणुकीसाठी 25 हजार रुपये ते 50 हजार रुपयांपर्यंत खर्च करु शकतात.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे. सुधारणेनुसार नगराध्यक्षासारखाच आता सरपंचपद थेट जनतेतून निवडला जाणार आहे.दरम्यान, ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या निवडणुकांसाठी 30 जुलै 2011 च्या आदेशानुसार सरसकट 25 हजार रुपयांची खर्च मर्यादा ठेवण्यात आली होती. मात्र, आता सदस्यांच्या संख्येनुसार बदल करण्यात आला आहे.
7 ते 9 सदस्यांसाठी 25 हजार व सरंपचासाठी 50 हजार रुपये, 11 ते 13 सदस्यासांठी 35 हजार व सरपंचासाठी 1 लाख रुपये व 15 ते 17 सदस्यासांठी 50 हजार रुपये व सरपंचासाठी 1 लाख 75 हजार रुपये खर्च मर्यादा ठेवण्यात आली आहे.

जि.प. शिक्षकांच्या बदल्याआता थेट मुंबईतून

औरंगाबाद,22-जिल्हा परिषदेत कार्यरत हजारो शिक्षकांच्या ऑनलाईन पद्धतीने जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या. ही प्रक्रिया थेट मुंबईतून ग्रामविकास विभागामार्फत झाली. राज्यभरातील शिक्षकांना मुंबईतून बदली व गाव मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. नेमक्या किती शिक्षकांच्या बदल्या झाल्या याची कुठलीच माहिती नसताना, शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्या की नाही हे माहिती न होताच तक्रारी सुरू झाल्या आहेत.
 दरवर्षी शिक्षकांच्या बदल्या या जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत होत्या. मात्र, यावेळी बदल्यांचे धोरण बदलले. ग्रामविकास विभागानेच राज्यभरातील शिक्षकांचे बदल्यांसाठी ऑनलाइन अर्ज मागवून घेतले. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातून अडीच ते तीन हजार शिक्षकांनी अर्ज केले. यामध्ये संवर्ग-१, सवर्ग-२, संवर्ग-३ अशा प्रकारे गंभीर आजारी पती-पत्नी एकत्रिकरणामध्ये ३० किलोमीटर पेक्षा जास्त अंतर. त्याशिवाय विधवा, परितक्त्या, अपंग यांनाही बदल्यांमध्ये विशेष सूट आहे. त्यानुसार शिक्षकांनी अर्ज केले. सर्व अर्ज एकत्रित करून शालार्थ प्रणालीतील मार्गदर्शक तत्वानुसार शिक्षकांच्या पहिल्या टप्प्यामध्ये बदल्या झाल्या. त्यांना मंत्रालयातूनच पदस्थापना दिली गेली. बदल्यांमध्ये सवलत, सूट मिळावी यासाठी अनेक शिक्षकांनी विविध क्लृप्तींचा वापर केल्याच्या तक्रारी झेडपीच्या शिक्षण विभागाकडे येत आहेत. एका शिक्षकेने एका अपंग मुलाला दत्तक घेऊन अपंग मुलगा दाखविला. काही महिलांनी परितक्त्या असताना पतीसोबत राहात असल्याचे कारण दिले आहे, काहींनी ३० किलोमीटर पेक्षा कमी अंतर असताना ते जास्तीचे असल्याचे दाखविले असल्याची तक्रार मुप्टा शिक्षण संघटनेचे संपत साबळे यांनी सोमवारी जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे प्रभार शिक्षणाधिकारी रवींद्र वाणी यांच्याकडे केली. संबंधितांची व्यक्तिगत पुराव्यानिशी तक्रार करा, निश्चित कारवाई होईल, असे वाणी यांनी स्पष्ट केले.

वाघाचा गुराख्यावर हल्ला, गुराखी गंभीर जखमी

चंद्रपूर, दि. 21 – वासेरा येथील सिंदेवाही तालुक्यातील मौजा जामसाळा (जुना ) येथे पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात एक गुराखी जखमी झाला आहे. जोगू तिमाजी रंधये (वय ६५ वर्ष) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. शिवणी वनपरिक्षेत्राअंतर्गत जामसाळा येथील जोगू रंधये हे नेहमी प्रमाणे जनावरे घेऊन जंगलाच्या दिशेने जात होते. यावेळी वाघाने जोगू यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. वनविभागाने जोगू यांना उपचारासाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे . गेल्या तीन दिवसांपूर्वी याच परिसरात वाघाने एका जनावराचाही खात्मा केला होता. या घटनेपासून वनविभागाने घटना स्थळावर कॅमेरे लावले होते. दरम्यान, क्षेत्र सहाय्यक एस. एन. कन्नाके, बीट वनरक्षक ए. एन. मेश्राम, वनमजुरासह वाघाचा शोध घेत आहेत.

ग्रामीण डाकसेवकांचा बेमुदत संप

gn 21 August, Bemudat Samp

गोंदिया,दि.21(बेरार टाईम्स): आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय ग्रामीण पोस्ट विभागाच्या डाकसेवकांनी १६ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे.दरम्यान गोरेगाव येथील डाक कर्मचाèयांनीही या संपात सहभाग नोंदविला असून तेथील कर्मचारी संपावर बसलेले आहेत. शासनाकडे अनेकदा प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात डाकसेवकांनी निवेदने दिलीत. मात्र शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शासनाच्या धोरणा विरोधात डाकसेवकांनी बेमुदत संप पुकारला आहे. डाकसेवकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये जीडीस कर्मचाèयांचे विभागीयकरण करणे व त्या कर्मचाèयांकडून आठ-आठ तास काम करून घेतात. मात्र, त्यांना नियमित करण्यात आले नाही. तेव्हा अशा कर्मचाèयांना नियमित करण्यात यावे. जीडीएस कर्मचाèयांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन देण्यात यावी. जीडीएस कर्मचाèयांना विभागीय कार्यालयातील कर्मचाèयांप्रमाणे सोईसुविधा देण्यात याव्यात. शाखा, डाकघर एबीसीडीच्या आधारावर वर्गीकरण करण्यात येऊ नये. या मागण्यांचा समावेश आहे. बेमुदत संपात संघटनेचे अध्यक्ष कॉ. एम.पी. बेले, उपाध्यक्ष कॉ. बी.डी. ठाकरे, कार्यकारी अध्यक्ष जे.पी. कावळे, सचिव आर.एस. लिल्हारे, कोषाध्यक्ष एन.एस. चोपकर, माजी सर्कल उपाध्यक्ष पी.टी. qसगाडे, एन.एच. कुमेरिया, बी.एफ. बागडे, सहसचिव ए.एम. पाटील, ए.बी. राऊत, बी.के. मेश्राम, एच.एच. सैय्यद, एस.आर. माहारवाडे, उपकोषाध्यक्ष आर.डी. ठवकर, पी.आर. देसाई, जी.टी. वाडीभस्मे, एम.एम. पराते, आर.एफ. साठवणे, बी.के. मुंगमोडे व इतर डाकसेवक सहभागी झाले होते.

क्षेत्रसहाय्यक आग्रेविरुध्द लाचप्रकरणी गुन्हा दाखल

गोंदिया,दि.२१-गोरेगाव वनविभागातंर्गत येत असलेल्या घुमर्रा येथील वन क्षेत्र सहाय्यक ओमप्रकाश आग्रे यांना ५ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तक्रारदाराने आपल्या शेतशिवारातील झाडे कापून ती पलखेडा येथे नेत असताना वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक ओमप्रकाश वसंतराव आग्रे यांनी ट्रक्टर पकडून कारवाई न करण्याकरिता ७ हजाराची मागणी केली.तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने नोदविलेल्या तक्रारीच्या आधारे ५ आगस्ट रोजी तपासणी केली असता आग्रे यांनी लाच मागणी केल्याची निष्पण झाल्याने त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...