Thursday 23 March 2017

टोल माफीऐवजी टोलधाड; 18 टक्के दरवाढ

मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास आता महागणार असून, सरकारने टोलमाफीऐवजी पुन्हा टोलधाड केली आहे. द्रुतगती मार्गावर 18 टक्के दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
या निर्णयामुळे मुंबई-पुणे प्रवास महाग होणार आहे. 1 एप्रिलपासून टोल दरात वाढ होणार आहे. 18 टक्के टोल वाढ होणार असल्याने वाहनधारकांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. 
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने 2004 मध्ये काढलेल्या अध्यादेशानुसार दर तीन वर्षांनी टोलच्या दरात 18 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ही वाढ करण्यात आली आहे. 95 किमी लांबी असलेला द्रुतगती मार्ग 1 मार्च 2002 मध्ये सुरु करण्यात आला होता.
राज्य सरकारने अनेक मार्गांवरील टोल बंद करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. द्रुतगती मार्गावरील टोलची मुदत संपल्याच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या होत्या. पण, आता टोल बंद होण्याऐवजी पुन्हा टोलवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे.
असे असणार दर - 
कार - 195 रुपयांवरुन 230 रुपये
मिनी बस आणि लहान मालवाहु वाहने - 300 ते 355 रुपये
ट्रक - 418 ते 493 रुपये
बस - 572 ते 675 रुपये

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...