Saturday 25 March 2017

अन्‌ पोलिस ठाण्यात विरोधकांचा संताप..!

मुंबई  - मंत्रालयात मारहाण झालेल्या शेतकरी रामेश्वर भुसारे यांना भेटायला गेलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना पोलिस अधिकाऱ्यांनी खोटी माहिती दिल्याने मरिन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये नेत्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, शेकाप नेते जयंत पाटील यांच्यासह इतर नेते व आमदार आज दुपारी पोलिस स्थानकात भेटायला गेले. मात्र अटकेतील शेतकरी भुसारे यांना न्यायालयात घेऊन गेल्याची माहिती संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी नेत्यांना दिली.
यामुळे अजित पवार यांनी थेट शेतकरी भुसारे यांनाच मोबाईलवरून संपर्क केला. त्या वेळी भुसारे पोलिस स्टेशनमधेच कैदेत ठेवल्याचे समोर आले. यामुळे संतापलेल्या शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी आतमधे जाऊन ज्या खोलीत डांबून ठेवलेल्या भुसारे यांना घेऊन आले. यामुळे सर्वच नेत्यांचा संताप झाला. पोलिस अधिकाऱ्यांना तर अजित पवार यांनी फैलावरच घेतले. खोटं बोलता, ही काय लोकशाही आहे काय, असा सवाल करत एवढी हिम्मत कशामुळे, या शब्दांत खडसावले.
संबंधित शेतकऱ्याला समोरचे दातचं नसताना तो चावा कसा घेतो अन्‌ त्याने चावा घेतला असेल तर त्यालाच सात टाके पडतील अशी जखम का होते, चावा घेतलेला पोलिस आतापर्यंत कुठे दडवून ठेवला आहे, असा प्रश्नांचा भडिमार अजित पवार यांनी केला.
सरकारच्या दबावाखाली पोलिस यंत्रणा काम करत असून, लोकशाहीची दडपशाही असल्याचा संताप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
आजच्या या प्रसंगाने विरोधी पक्षनेते कमालीचे संतापले असून, शेतकरीविरोधी सरकारच्या धोरणांचा जनतेत जाऊन पंचनामा करू, असा इशारा दिला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...