
19 आणि 20 मार्च रोजी आयोजित व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या आणि समाजासमोर आदर्श ठरलेल्या पंचवीस व्यक्ती तसेच सोळा संस्थांना व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या साहित्य संमेलनात विविध कार्यक्रमांची रेलचेल राहाणार आहे. मनोरंजन तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रमांसोबतच विविध सामाजिक विषयांवर चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात आले आहे. व्यसनाधिनता आणि महिलांचा लढा, युवकांना व्यसनांचा विळखा, अंमली पदार्थांचे महाराष्ट्राला आव्हान, साहित्यिक आणि प्रसार माध्यामांची जबाबदारी अशा अनेक विषयांवर चर्चासत्रांमध्ये विचारमंथन करण्यात येणार आहे.
राज्यातील विविध विषयांतील मान्यवर विचारवंत, पत्रकार, अभ्यासक, लेखक चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी वीस मार्चला नशाबंदी मंडळाच्या वतीने ‘व्यसनमुक्तीचा ऑर्केस्ट्रा’चे आयोजन केले आहे. संमेलनाच्या शेवटच्या सत्रात संत साहित्यातील व्यसनमुक्तीचा संदेश या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवसीय साहित्य संमेलनाला कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, गृह व नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषधी प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार प्रामुख्याने उपस्थित रहाणार आहेत. तसेच अमरावतीचे महापौर संजय नरवणे जिल्हा पिरषद अध्यक्ष सतीष उईके, खा. आनंदराव अडसूळ, खा. रामदास तडस, आ. श्रीकांत देशपांडे, आ. डॉ. सुनील देशमुख, आ. विरेंद्र जगताप, आ. ओमप्रकाश कडू, आ. ॲड. यशोमती ठाकूर, आ.अनिल बोंडे, आ. रविकुमार राणा, आ. प्रभुदास भिलावेकर, आ. रमेश बुंदेले, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे सचिव डॉ. सुरेंद्रकुमार बागडे, आयुक्त पियुष सिंह आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
No comments:
Post a Comment