Saturday 28 April 2018

त्या चकमकीतील ५ नक्षलांचे मृतदेह अद्यापही घरच्यांनी स्विकारले नाही

गडचिरोली,दि.28 : गडचिरोली जिल्ह्यातील ऐतिहासिक चकमक म्हणजे भामरागड तालुक्यातील ताडगाव (कसनसूर) हि चकमक संपूर्ण देशात गाजली होती. तसेच जिमलगट्टा उपविभागातील नैनेर परिसरात सुद्धा ६ नक्षलांना पोलिसदलाने ठार केला या दोन चकमकीत एकुण ३९ नक्षलांना कंठस्थान मिळाले होते. तसेच यामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड येथील नक्षलांचा समावेश होता. १८ नक्षलांची ओढक पटली असून १३ नक्षलांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपवण्यात आले. मात्र ५ नक्षलांच्या कुटुंबाचे अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही.
तसेच या ५ मृतदेहामध्ये सुमन कुळयेटी रा. पडतनपल्ली ता. भामरागड जि.गडचिरोली, शांताबाई उर्फ मंगली पदा रा.गंगलूर जि. बिजापूर (छ.ग.), तिरुपती उर्फ धर्मु पुंगाटी रा. केहकापहारी ता. भामरागड जि. गडचिरोली, राजू उर्फ नरेश कुटके वेलादी रा.जिजगाव ता. भामरागड जि. गडचिरोली, क्रांती पश्चिम बस्तर परिसर (छ.ग.) असे या नक्षल मृतकाचे नाव असून हे मृतदेह ग्रामीण रुग्णालय गडचिरोली येथे ठेवण्यात आलेला आहे. तसेच अद्यापही या ५ नक्षलांचे नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नसल्याने पोलीस अधिक्षकांनी नक्षलांच्या कुटुंबियांना आव्हान केले आहे कि, या नक्षलांच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालय किंवा पोलीस अधिक्षक कार्यालय गडचिरोली येथे संपर्क करून हे मृतदेह ताब्यात घ्यावे. तसेच इतर ठार झालेल्या नक्षल मृतदेहची ओढक असेल तर संपर्क करावा.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...