Saturday 18 May 2019

१८ शेतमजूरांना जेवणातून विषबाधा

अकोला,दि.18ः- जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील कार्ला येथील एका शेतात कांदा मळणीच्या कामासाठी आलेल्या मजुराना जेवनातून विषबाधा झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली. या सर्व मजुरांनार उपचाराकरीता आलेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती ठीक असल्याचे वैद्यकिय अधिकारी डाॅ.फैजान असलम यांनी सांगितले.
पातूर तालुक्यातील कार्ला शेत शिवारात कांदा मळणीचे काम सुरू आहे. यासाठी खामगाव तालुक्यातील अटाळी व पातुर तालुक्यातील तुलंगा येथील २६ मजूर काम करण्यासाठी कारला या गावांमध्ये आले होते. आज सकाळी अचानक यातील काही लोकांना मळमळ,उलट्या,पोट दुखणे,संडास असा त्रास सुरु झाल्यांने त्यांनी सकाळीच जवळच असलेल्या आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेऊन उपचार घेतले. उपचार दरम्यान त्यांना विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले.त्यामध्ये अविनाश भोसले, सुनील चव्हाण ,अरुण पवार, शालू भोसले, दिव्या चव्हाण, पल्लवी चव्हाण ,दिलीप पवार, वैजांती भोसले, प्रवीण काळे, खडकाळ सिंग पवार, जनाबाई पवार, देव चव्हाण, साहिल भोसले ,महेश भोसले ,वैशाली भोसले यांचा समावेश आहे. यामध्ये काही महिला व लहान मुलांचा समावेश असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फैजान असलम यांनी सांगितले. दरम्यान बुद्ध पौर्णिमेनिमित्त सुट्टी असूनही वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फैजान असलम हे प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर होते. त्यामुळे शेतमजुरांना योग्य उपचार मिळाला.यावेळी डॉक्टरांना मदतीसाठी फार्मासिस्ट संदीप लांडगे परिचारिका इंगळे साबळे आदि कर्मचारी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...