Friday 10 January 2020

दोन वर्षात सगळ्यात जास्त आत्महत्या बेरोजगारांच्या,महाराष्ट्रात सर्वाधिक




दिल्ली(वृत्तसंस्था)दि.10 : आर्थिक अडचणींमुळे आत्महत्त्या हा विषय निघाला म्हणजे आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो शेतकरी. पण आपल्या या कल्पनेला राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या आकडेवारीने धक्का दिला आहे. गेल्या २ वर्षात सर्वात जास आत्महत्त्या बेरोजगारांनी केल्या आहेत.या आकडेवारीनुसार, २०१७-१८ या वर्षात १२,९३६ बेरोजगार व्यक्तींनी आत्महत्या केली आहे. हा आकडा एकूण आत्महत्यांपैकी ९.६ टक्के आहे. तर याच काळात १०,३४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा आकडा एकूण आत्महत्यांपैकी ७.७ टक्के आहे.आत्महत्यांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक (३४.७ टक्के) प्रमाण आहे. त्यानंतर कर्नाटक (२३.२), तेलंगाणा (८.८), आंध्र प्रदेश (६.४) आणि मध्य प्रदेश (६.३ ) या राज्यांचा क्रमांक लागतो. पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, उत्तराखंड, मेघालय, गोवा आणि चंदीगड येथे शेतीसंबंधित आत्महत्यांची नोंद शून्य आहे.
देशातील एकूण आत्महत्यांच्या आकडेवारीनुसार, २०१७ या वर्षात १ लाख २९ हजार ८८७ तर २०१८मध्ये १ लाख ३४ हजार ५१६ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. २०१८ या वर्षात आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत ३.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.सन २०१७ मध्ये एकूण आत्महत्यांपैकी बेरोजगारांनी १२,२४१ (९.४ टक्के) तर १०,६५५ शेतकऱ्यांनी (८.२ टक्के) आत्महत्त्या केल्या आहेत. २०१६ मध्ये एकूण (१,३१,००८) आत्महत्यांपैकी शेतकऱ्यांनी ८.७ टक्के (११,३७९) आत्महत्या केल्या आहेत. २०१५ मध्ये एकूण (१,३३,६२३) आत्महत्यांपैकी बेरोजगारांनी ८.२ टक्के (१०,९१२) तर शेतकऱ्यांनी ९.४ टक्के (१२,६०२) आत्महत्या केल्या होत्या. तर सन २०१४मध्ये सरकारी आकडेवारीनुसार, एकूण आत्महत्यांपैकी बेरोजगारांनी ७.५ टक्के तर शेतकऱ्यांनी ४.३ टक्के शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
आत्महत्या करणाऱ्या बेरोजगारांमध्ये ८२ टक्के पुरुष आहेत. त्यातही सर्वाधिक केरळ (१,५८५) त्यानंतर तामिळनाडू (१,५७९), महाराष्ट्र (१,२६०), कर्नाटक (१,०९४) आणि उत्तर प्रदेशात (९०२) बेरोजगारांनी आत्महत्या केल्या होत्या.शेती क्षेत्रात ५,७६३ शेतकऱ्यांनी आणि ४,५८६ शेतमजुरांनी आत्महत्या केल्या आहेत. २०१८मध्ये शेती क्षेत्रातील आत्महत्यांपैकी ५,४५७ पुरुष तर ३०६ महिलांनी आत्महत्या आहेत. तर शेतमजुरांमध्ये ४,०७१ पुरुषांनी आणि ५१५ महिलांनी आत्महत्या केल्या आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...