Wednesday 15 January 2020

सत्यशोधक पध्दतीने लग्न सोहळा,भेटवस्तुंची रक्कम शिष्यवृत्ती निधीत



जेंगठे व गायकवाड कुटुबियांच्या लग्न सोहळ्याची सर्वत्र चर्चा
ब्रम्हपुरी(खेमेंद्र कटरे)दि.15- लग्न हा ज्याच्या त्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. कुणी ही आठवण संस्मरणीय करण्यासाठी ढगांच्या निळाईच्या रंगात विवाहाच्या आणाभाका घेतात तर कुणी लग्न करतो,ते अथांग पाण्याच्या खोलीत जलराजाच्या साक्षीने विवाहाचा स्विकार करतात.तर कुणी पैसाचा अखंड चुराडा करत अनेक राजेशाही जेवणाच्या फैरी झाडत विवाह बंधन स्विकारतात. प्रश्न ज्याचा त्याचा आणि आवड ज्याची त्याची!पण या सगळ्या गोष्टिंना फाटा देत वैचारिकतेचा वारसा जपत समाजाच्या जाचक रुढींना फाटा देत एक अनोखे लग्न नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी येथे ११ जानेवारीला पार पडले.ज्यामध्ये वधूपक्षाच्या समंतीने विवाहसोहळ्यात होणारा सर्व खर्च आणि विवाह सोहळ्यात आलेली रक्कम ही शिष्यवृत्ती निधी म्हणून गोळा करुन गरीब अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी वापरण्याचा निर्णय घेतला गेल्याने या सोहळ्याची चर्चा सोबतच प्रशंसाही केली जाऊ लागली आहे.
शंशाक ज्योती नामदेवराव जेंगठे(ब्रम्हपुरी) आणि कांचन ज्योती दत्तात्रय गायकवाड(औरगांबाद)या अमेरीकेत अभियंत्याची नोकरी करीत असलेल्या जोडप्याने व त्यांची आईवडिलांनी लग्नावर लाखो रुपयांचा खर्च करण्याची स्पर्धा सुरु असतानाच या जोडप्याचे ङ्कसत्यशोधक पध्दतीनेङ्क विवाह करत जात,धर्म,जाचक रुढी,परंपरा,रिती-रिवाज यांच्या काळानुरूप बदल करत समाजाला नवा मार्ग दाखविला आहे.या विवाहसोहळ्याच्या सभागृहातील प्रवेशद्वारावरच नागभीड तालुक्यातील झाडबोरी येथील आशिष चौधरी यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची रांगोळीतून साकारलेली प्रतिमा आकर्षणाची केंद्र ठरली होती.विवाहसोहळ्यात येणाèया प्रत्येकाला ही रांगोळी नवा संदेश देत होती.विवाहाच्या सुरवातीलाच वधु व वरपक्षाच्यावतीने प्रत्येकी ५० हजार रुपये शिष्यवृत्ती निधीकरीता असलेल्या पेटीत टाकले.विशेष म्हणजे ज्यांनी वधुवरांना भेट देण्यासाठी वस्तु आणल्या त्या सर्वांना नम्रपुर्वक परत करण्यात आल्या,तर ज्यांनी रोखरक्कमेचे पॅकेट आणले ते पॅकेट स्वतःन स्विकारता ते शिष्यवृत्ती मदत पेटीत स्वतःच भेटकत्र्याला टाकायला सांगत वधुवरांना फक्त आशिर्वाद देण्याचे आवाहन करण्यात आले होते.हा विवाह सोहळा जुन्या चालिरीतांना फाटा देत महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विवाह पध्दतीने लावण्यात आला हे विशेष होते.त्यातच या विवाहसोहळ्याला आलेल्या प्रतिष्ठित सामाजिक व्यqक्तचा शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या सर्व प्रकाराने या सोहळ्याची मात्र सर्वत्र जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
या लग्नाची सुरवात क्रांतीसुर्य महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन करण्यात आली. या लग्नसोहळ्यात सहभागी झालेल्या प्रियजनांना ओबीसी सत्यशोधक चळवळीतील विचारवंत असलेले प्रा.नामदेवराव जेंगठे लिखित सत्यशोधक विवाह पध्दती ही पुस्तक भेट स्वरुपात देण्यात आली.मंगलकार्यालयाच्या दोन्ही बाजूला धर्म माणुसकी जात मानवतेचा संदेश विवाह सोहळ्यास येणाèया मित्र परिवारांना देणारे.हसतमुख जोडप्यांच्या पालकांचे कटआऊट्स पण सहजपणे मोठे विचार मांडणारे होते.सत्यशोधक विचार समाजाला देणाèया फुले दाम्पत्याची रांगोळीतून साकारलेली प्रतिमा समतेचा आणि माणुसकीचा पुरस्कार करणारीच होती.समाजाचा विकास आणि वैचारीक परिवर्तन करण्यासाठी हे पालकांनी उचलेल्या पावलांना या तरुण पिढीकडून मिळालेले बळ,याचे खरचं कौतूक वाटते!महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी सत्यशोधक विचारातून काळाप्रमाणे बदल घडविण्यास स्वत:पासून सुरवात करणाèया या जोडप्यास तसेच।उत्तरोत्तर अशीच मानवतेची सेवा करण्यासाठीत्यांच्या सहजीवनासाठी शुभेच्छा!
या कार्यक्रमाला बहुजन संघर्षंचे संपादक नागेश चौधरी,पुष्पा चौधरी,प्रमोद मुन,शरद वानखेडे,पांडुरंग काकडे,गोविंद वरवाडे,ब्रम्हपुरीचे माजी आमदार अतुल देशकर,माजी नगराध्यक्ष अशोक भैय्या,प्राचार्य एन.एस.कोकोडे,अ‍ॅड गोविंद भेंडारकर,प्रा.श्याम झाडे,वामनराव वझाडे,गिरधर लडके,दिगबंर पारधी,भाऊराव राऊतसह आदी गणमान्य मंडळीची उपस्थिती लाभली होती.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...