Thursday 2 January 2020

निवडणुक कामाकरीता शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करा-राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाची मागणी

चंद्रपूर,दि.02 जानेवारीः- मतदार याद्या शुध्दीकरण कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्याने शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याने दुर्गम भागातील जिवती तालुक्यातील शिक्षकांच्या नियुत्या रद्द करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
 यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिवती तालुक्यातील भौगोलिक स्थिती पाहता शिक्षकद्वारे चांगले काम होत असल्याचे मान्य करून प्रायोगिक तत्वावर प्रगणक म्हणून उत्तम काम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. कोणत्याही शिक्षकावर फौजदारी कारवाई होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट सांगितले. मुख्य निवडणूक आयुक्त यांचा दौरा असल्यामुळे काम पूर्ण करण्यास सांगितले. गरज वाटल्यास काही दिवसांसाठी शिक्षकांना कार्यमुक्त करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात येईल,असे आश्वासन  जिल्हाधिकारी यांनी दिले. तसेच शिक्षकांवर कोणतीही कारवाई होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा शिक्षकांच्या मागणीबाबत विनंती करण्यात आली. सदर भेटीमध्ये सचिन राजूरकर महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ,राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्याम भाऊ लेडे, कालिदास येरगुडे, उमाजी कोडपे, तसेच संभाशिव गावंडे व शिक्षक बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...