Thursday 2 January 2020

५९२ तळीरामांवर कारवाई

नागपूर,दि.02 -  नववर्षाच्या स्वागतासाठी बहुतांश लोकांनी सेलिब्रेशनसाठी रात्रीचे प्लॅनिंग केले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास पावसाने शहरात दमदार हजेरी लावल्याने सेलिब्रेशन करणाऱ्या बहुतांश लोकांचा हिरमोड झाला. रस्त्यांवर दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्यांसाठी पोलिसांनी बॅरीगेट्स आणि फिक्स प्वाइंट्स तयार करून कंबर कसली होती. मात्र, अचानक आलेल्या पावसाने दुचाकीस्वारांची रस्त्यावर एन्ट्रीला स्वयंस्फूर्त ब्रेक लागल्याने रात्री १२ वाजताच्या सुमारास रस्ते शुकशुकाट बघायला मिळाला. त्यामुळे शहरात फक्त ५९२ दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या लोकांवर पोलिसांनी यंदा कारवाई केली आहे.
मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज होती. तर दुसरीकडे पोलिसही कंबर कसून होते. वाहतुकीस कुठल्याही प्रकारे अडथळा निर्माण होणार नाही, याची पूर्णपणे तयारी पोलिसांनी केली होती. मद्याच्या अंमलाखाली राहून कोणीही वाहन चालवू नये असा नियम असतानासुद्धा काही अतिउत्साही तरुण मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळून आले. अशा ५९२ वाहनचालकांवर कारवाई करून पोलिसांनी त्यांची नशा उतरविली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...