Friday 10 January 2020

सीएए कायदा मागे घेतल्याशिवाय आंदाेलन थांबविणार नाही : यशवंत सिन्हा




पुणे(विशेष प्रतिनिधी)दि.10 : नागरिकत्व संशाेधन कायदा ( सीएए) हा गैरसंविधानिक कायदा असून काळा कायदा आहे. या कायद्याच्या विराेधात आम्ही गांधी शांती यात्रा महाराष्ट्रातून सुरु केली आहे. ही यात्रा भारताच्या विविध राज्यांमधून दिल्लीतील राज घाटावर जाणार आहे. सरकारने सीएए हा कायदा मागे घ्यावा अन्यथा आम्ही राजघाटावर आंदाेलन सुरु ठेवणार आहाेत असा निर्धार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केला. पुण्यात गांधीभवन येथे आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. यावेळी खासदार शत्रुघ्न सिन्हा, माजी मुख्यंमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार आशिष देशमुख, गांधीभवनचे प्रमुख डाॅ. कुमार सप्तर्षी उपस्थित हाेते.
राष्ट्रमंच, फ्रेंड ऑफ डेमोक्रसी, शेतकरी जागर मंच या संघटनांकडून गांधी शांती यात्रा काढण्यात आली आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापासून या यात्रेला सुरुवात झाली. आज ही यात्रा पुण्यातील गांधी भवन येथे आली. यावेळी सिन्हा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सिन्हा यांनी सरकारवर जाेरदार टीका केली. ते म्हणाले, देशात आज अशांती आहे. सीएए या कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. या कायद्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. याच्या विराेधात युवक रस्त्यावर उतरले आहेत. देशातील विद्यापीठ आंदाेलनाची केंद्रे बनली आहेत.विद्यार्थ्यांच्या आंदाेलनांचं दमण भाजप शासित राज्यांमध्ये हाेत आहे. गांधींच्या विचारांच्या विपरीत सरकार काम करत आहे. त्यामुळे आम्ही ही यात्रा काढण्याचा निर्णय घेतला.
केंद्रातील मोदी सरकारच्या हुकूमशाहीला महात्मा गांधीजी यांच्या अहिंसेच्या मार्गाने उत्तर द्यायला हवे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केले. तर केंद्राचा नागरिकत्व सुधारणा करणारा कायदा हा देशाचा विभाजन करणारा असून, आम्ही पुन्हा एकदा महात्मा गांधी यांची हत्या होऊ देणार नाही, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे बोलताना दिला.
केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात माजी केंद्रीय मंत्री व पूर्वाश्रमीचे भाजप नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या महात्मा गांधी शांती यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेटवे येथे गुरुवारी सकाळी हिरवा झेंडा दाखविला. केंद्र सरकार हुकुमशाही नीती वापरत असल्याचा आरोप करुन दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात जे काही झाले ते योग्य नव्हते. त्या घटनेचा संपुर्ण देशात विरोध होत आहे. केंद्र सरकारच्या हुकुमशाहीला गांधीजींच्या अहिंसा तत्वाने उत्तर द्यायला हवे, असे पवार यांनी आवर्जून स्पष्ट केले.माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रकाश आंबेडकर, भालचंद्र मुणगेकर, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यासह मान्यवर हजर होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...