नवी दिल्ली,दि.24(वृत्तसंस्था): राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा केंद्र सरकारने तडकाफडकी हटविली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रा तील सत्ताबदलाची पार्श्वभूमी सरकारच्या या निर्णयाला असल्याचीही चर्चा आहे.अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सुरक्षा पुरवली जाते. संबंधित व्यक्तीला असलेल्या धोक्याची तीव्रता लक्षात घेऊन याबाबत निर्णय घेतला जातो. वेळोवेळी सुरक्षेचा आढावा घेतला जातो. सुरक्षेत कपात करायची असल्यास संबंधित व्यक्तीला त्याची पूर्वकल्पना दिली जाते. मात्र, शरद पवारांच्या बाबतीत असे काहीही झालेले नाही. पवारांची सुरक्षा काढण्याचे कुठलेही कारण सरकारने दिलेले नाही, असे दिल्लीतील त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया। संपूर्ण महाराष्ट्र प्रदेश में सबसे ज्यादा गंभीर स्थिति और कोरोना का हमला पुरा महाराष्ट्र प्रदेश झेल रहा है, एैसी स्थिति में राज्...
-
नवेगावबांध,दि.21: व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली मोठी कीड आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक तरुण वाईट मार्गाला लागत आहे. गावातील अवैध ध...
No comments:
Post a Comment