Thursday 9 January 2020

देशव्यापी आंदोलनाला गोंदिया जिल्ह्यात कर्मचार्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

गोंदिया,दि.08-  राज्यातील कर्मचाऱ्यांनी आज पुकारलेल्या संपाला गोंदिया जिल्ह्यात शंभर टक्के पाठिंबा मिळाला असून भर पावसातही कर्मचार्यांनी आंदोलन केले.जिल्ह्यातील पंचायत समिती,तहसिल कार्यालय,बँका,पोस्ट,आयकर विभाग,दुरसंचार विभागासह विविध कार्यालयासमोर कर्मचार्यांनी केंद्रसरकारविरोधात घोषणा दिल्या.त्यानंतर सर्व संघटंनाच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी(सामान्य) सुनिता बेलपात्रे यांना दिले.
देशभरातील महागाई , आर्थिक मंदी, बेरोजगारी, कामगार कायद्यात मालक धार्जिणे बदल , खाजगीकरण,उदारीकरण, कंत्राटीकरण, आणि जनविरोधी धोरणामुळे केंद्र सरकार विरोधी देशातील श्रमीक, जनता, कामगार – कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असल्याने देशभरातील 11 केंद्रीय ट्रेड युनियन व अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ तथा विविध अखिल भारतीय कामगार कर्मचारी, असंघटित कामगार, कंत्राटी कामगार, किमान वेतन कर्मचारी, श्रमिक – शेतकरी शेतमजूर या संघटनांच्या देशातील २0 कोटी औद्योगीक कामगार – कर्मचारी, श्रमीक वर्गाने आज  ८ जानेवारीला एक दिवसीय देशव्यापी आंदोलनाचे आवाहन केले होते.यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील केंद्रीय व राज्य सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर, महानगरपालिका, नगरपालिका, आऊटसोर्सिंग, कंत्राटी व अल्पवेतनी कर्मचारी,पोस्ट विभाग,आयकर विभागासह,अंगणवाडी सेविका,बालवाडी सेविका,आरोग्यसेविकाही सहभागी झाल्या होत्या.विशेष म्हणजे सकाळपासूनच पावसाने सुरवात केल्यानंतरही सर्व कर्मचारी आपआपल्या कार्यालयासमोर भरपावसात निदर्शने करीत होती.तर येथील प्रशासकीय कार्यालयात गोंदिया शहरातील सर्व कर्मचारी एकत्रित झाले होते.

आंदोलन हे जुनी पेन्शन योजना लागू करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे,पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस व इतर जिवनावश्यक वस्तूवरील दर नियंत्रनात आणणे, अतिवृष्टीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून तात्काळ मदत देण्यात यावी. स्वामीनाथन आयोग लागु करण्यात यावे.औषधे, खते,बियाणेचे किंमती नियंत्रनात आणणे,
केंद्र व राज्य सरकारचे विविध विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरणे, रद्द व व्यपगत करण्यात आलेली पदे पुनर्जिवित करणे,डीसीपीएस मधील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना रुपये दहा लक्ष सानुग्रह अनुदान लागु करणे,बक्षी समितीचा दुसरा खंड प्रसिद्ध करून कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी दुर करणे, केंद्राप्रमाणे सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन भत्ते लागू करणे.जानेवारी१९ चा महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै१९ पासून थकीत महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील सर्व प्रस्ताव विना अट निकाली काढून रिक्त पदे तात्काळ भरणे, केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षे बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना मुख्यालयाबाबतचा ग्रामविकास विभागाचा ९ सप्टेंबर१९ चा शासन आदेश रद्द करणे,उत्कृष्ठ कामासाठी पूर्वीप्रमाणे आगाऊ वेतन वाढी लागू करणे, केंद्र शासनाने विहीत केल्यानुसार ५ दिवसाचा आठवडा लागु करणे, केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्ष करणे, कंत्राटी, ग्रामरोजगार सेवक, व संगणक परीचालक कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत प्रश्न मार्गी लावणे,सहाय्यक गट विकास अधिकारी यांचे नविन पदे निर्मीती करून जिल्हा परीषद संवर्गातुन रिक्त पदे तात्काळ भरणे, मागील काळात सरकारचे “सकारात्मक चर्चा व नकारात्मक धोरणामुळे ” शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यासह सर्व कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत प्रश्न मार्गी लावणे,
ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना यावलकर समितीच्या शिफारशी नुसार नगर परीषद कर्मचाऱ्या प्रमाणे वेतन भत्ते व सुधारीत आकृती बंध लागू करणे,अंगणवाडी कार्यकर्ती/मदतनीस व आशा सेविका यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देवुन वेतनश्रेणी लागु करणे, कामगार कायद्यातील कामगार विरोधी व मालक धार्जीने बदल मागे घेणे, देशातील सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरन निर्णय बंद करणे,औद्योगिक उद्योगांचे परराज्यात होणारे स्थलांतर बंद करणे, बंद पडलेले कारखानदारी सुरू करून नवीन उद्योगधंद्यांना चालना देणे, आयआयटी पार्क हबला चालना देऊन शिक्षणावर लाखो रुपये खर्च झालेल्या युवकांची बेरोजगारी कमी करणे या प्रमुख मागण्यांसाठी आयोजित करण्यात आले होते.
या आंदोलनात जिल्हा परीषदेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत / उद्योग , कृषी तांत्रीक, पशु चिकीत्सा, शाखा अभियंता, स्थापत्य अभियंता, अंगणवाडी सुपरवायझर,वनविभाग, शिक्षक शिक्षकेत्तर, नर्सेस, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक तंत्रज्ञ अधिकारी, लिपीक, लेखा विभाग, वाहन चालक, परीचर, मैल कामगार,पोस्ट कर्मचारी,आयकर कर्मचारी तसेच जिल्हा परीषद संवर्गातील कर्मचारी संघटनासह सर्व विभागात कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचारी, अंगणवाडी, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक, संगणक परिचालक, संघटना सहभागी झाल्या होत्या.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे  निमंत्रक लिलाधर पाथोडे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ अध्यक्ष पी.जी.शहारे, सरचिटणीस शैलेश बैस, उपाध्यक्ष कार्तिक चौहान, कोषाध्यक्ष अजय खरवडे,ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन,महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना गोंदिया जिल्हा सचिव आशिष रामटेके,प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे, दयानंद फटिंग,कविता बागडे,लक्ष्मण ठाकरे,विस्तार अधिकारी कर्मचारी संघटनेचे विनोद चौधरी,राजू लदरे,गुणवंत ठाकूर,सुभाष खत्री,संतोष तोमर,इंजि.गोवर्धन बिसेन,इंजि.वासुदेव रामटेककर,संतोष तुरकर,अजय कोठेवार,लिलाधर तिबुडे,राजेश कुंभलवार,संध्या रेटर,सालेकस्यात जि.एस.पवार,तेजस्विनी चेटुले,रहागंडाले,सडक अर्जुनीत किशोर डोंगरवार,भाकप नेते व अगंणवाडी कर्मचारी नेते हौसलाल रहांगडाले,रामचंद्र पाटिल,मिलिंद गणवीर,शालू कुथे,शकुंतला फर्टिंग,आम्रकला डोंगरे,शेखर कनौजिया,चरणदास भावे,करुणा गणवीर,कल्पना डोंगरे,क्रांति गणवीर,सी.के.ठाकरे,विवेक काकडे,डाॅ.परवेज सय्यद,संगिता अंबुले यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...