Thursday 20 February 2020

हर ,हर ,महादेवाचा गजर प्रतापगडावर हिंदू ,मुस्लिम,तिबेटीयांच्या एकतेचे प्रदर्शन

बोंडगावदेवी(विनायक राखडे)ः   राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या व गोंदिया जिल्ह्यापासून 85 किलोमीटर अंतरावर असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील  अर्जुनी-मोर पासून नवेगाव [बांध ]राष्ट्रीय उद्यानापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या झाडी, झुडपी वनराईने त्याचप्रमाणे डोंगरदऱ्यांच्या पायथ्याशी इटीयाडोह धरनाच्या कुशीत असलेला प्रतापगड सर्वांच्या परिचयाचा आहे .या प्रतापगडावर हिंदू-मुस्लीम सह तिबेटी बांधवांचे धार्मिक ऊत्साह या ठिकाणी पार पडतात .चारशे वर्षाचा इतिहास हिंदू-मुस्लीम तिबेट एकतेचेत प्रतीक  आहे.प्रतापगडच्या या इतिहासिक यात्रेला 21 फरवरी पासून सुरुवात होत आहे .दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षात ही यात्रा येत असते ,यात्रेमध्ये राजकीय सामाजिक धार्मिक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून प्रतापगड 85 किलोमीटर अंतरावर नवेगाव (बांध )अर्जुनी मोरगाव तालुक्‍याच्या ठिकाणापासून 20 किलोमीटर अंतर आहे .याच परिसरात गोड राज्याचे राज्य असल्याने तटस्थ असा किल्ला सुद्धा आहे .या किल्ल्यापासून सानगडी किल्ल्यावर जाणारा आधीचा भुयार मार्ग 45 किलोमीटर अंतर असल्याचे वयोवृद्ध सांगत होते. अगदी उंच डोंगराच्या चौऱ्या गडावरभगवान शंकराचेमंदिर व मंदिराच्या बाजूला भव्यदिव्य भगवान शंकराची मूर्ती नंदीबैल स्थापना झालेली आहे .या भव्य मूर्ती वरती संकट कोसळून मूर्ती विद्रूप झाल्याने ,नवीन भव्य मूर्तीची स्थापना नानाभाऊ पटोले विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र (राज्य )यांनी 21.3फुटउंच असलेली नवीन मूर्तीची स्थापना करून अभिषेक करून महायज्ञ केला .
20 फरवरी रोजी महा यज्ञाची  समाप्ती  होऊन 21 फरवरी पासून या यात्रेला सुरुवात होत आहे .याच परिसरात  ख्वाजा उस्मानी गणी हारून यांचा दर्गा आहे .मोठ्या प्रमाणात हिंदू ,बांधव एकत्र भगवान शंकराचे व मुस्लिम बांधव दर्ग्यात जाऊन नमाज पढतात. याच परिसरात धरणाच्या कुशीत वसलेली तिबेट ,बंगाली वसाहत आहे. तिबेटी वसाहतीमध्ये  दिवाळीचा धार्मिक सण  जल्लोष असतो, या तिहेरी सणाला मोठ्या संख्येने भाविक _भक्त जनसमुदाय उपस्थित राहतो .भाविक भक्त प्रतापगडाच्या भेटी बरोबर इटियडोह धरण ,नवेगाव (बांध )रमणीय स्थळाला भेट देऊन  शांत मनाने गावाकडे वाढतात .प्रतापगड यात्रेला येणाऱ्या जाणाऱ्या साठी बस गाड्यांची सोय ,पिण्याच्या पाण्याची सोय ,भोजनाची व्यवस्था उपवासाचा नाश्ता यांची व्यवस्था असते . कार्यक्रमासाठी नानाभाऊ पटोले अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे ,माजी आमदार राजकुमार बडोले,मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांचेसह तालुक्यातील शेकडो  राजकीय नेते व भक्त जण उपस्थित राहणार आहेत. वनराईने व्यापलेला हा प्रतापगड परिसर पाहण्यासाठी भाविक उत्सुक असतात मुस्लिम बांधवांच्या वतीने दर्ग्याच्या परिसरात कव्वाली चे आयोजन केलेले आहे .प्रतापगड हिंदू-मुस्लीम व तिबेटी वसाहतीचे असे तिहेरी कार्यक्रम होतात .या कार्यक्रमाला कसल्याही प्रकारचा गालबोट लागत नाही. ही एक धन्यता आहे. हर बोला हर हर महादेव च्या गजरात भाविक मोठ्या संख्येने प्रतापगडाकडे रवाना होत आहेत. या परिसराला पर्यटक स्थळ बनविण्याचा नानाभाऊ यांचा प्रयत्न असून यामुळे परिसरातील बेरोजगारांना वर्षभर रोजगार मिळेल ,वन-उपजात मालावर प्रक्रिया उद्योग आणून आदिवासींना रोजगार मिळेल यासाठी नानाभाऊ पटोले प्रयत्नशील आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...