Friday 14 February 2020

जन्माच्या तीन तासांत बदलले बाळाचे रक्त;गोंदियातील पहिलाच प्रयोग यशस्वी


गोंदिया,दि. 14 : एकेकाळी गोंदियातील रुग्ण लहान सहान कारणांकरिता नागपूर येथे पाठविण्यात येत होते. त्याचा आर्थिक भूर्दंड रुग्णाच्या नातलगांना सहन करावा लागत होता. शिवाय वेळ देखील वाया जात होता. नागपूरला जाण्याकरिता साडेतीन ते चार तासांचा वेळ लागत असल्यामुळे प्रसंगी रुग्णाचा जीव जाण्याची भिती देखील राहत होती. मात्र आजघडीला शहरात उच्च आरोग्य सेवा मिळण्यास सुरुवात झाली आहे. उच्चशिक्षण घेवून येथे डॉक्टर स्थिरावत आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीत देखील रुग्णांना उपचार मिळू लागला आहे. कठीणात कठीण असा उपचार करण्यात येथील गोंदिया सेंट्रल हॉस्पीटलमध्ये नवजात शिशू विभागाचे विशेषज्ञ डॉ. सुनील बाळकृष्ण देशमुख यांनी करून दाखविला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील अर्चना दीपक गजभिये यांना प्रसूतीकरिता दाखल करण्यात आले. प्रसूती झाल्यानंतर बाळाच्या आईचा रक्तगट निगेटिव्ह असल्यामुळे बाळाला गर्भाशयातच अॅनिमिया झाला होता. त्यामुळे पिलीयाचा आजार वाढला होता. त्या बाळाच्या जीवाला धोका होता. त्यामुळे त्याचे रक्त बदलणे गरजेचे होते. डॉ. सुनील देशमुख यांनी हे प्रकरण अत्यंत शिताफीने हाताळले. बाळाच्या जन्माच्या दिवशीच अवघ्या ३ तासांच्या आत बाळाचे रक्त बदलण्यात आले. हा प्रयोग जिल्ह्यातील पहिलाच आहे. डॉ. देशमुख एमबीबीएस एमडी फेलोशिपप्राप्त आहेत. त्यांनी आपले शिक्षण केईएम या नामांकीत रुग्णालयात केले. त्या बाळाला सात दिवसांच्या आत सुटी देण्यात आली.  उल्लेखनीय म्हणजे अवघ्या ३० तासांत बाळाचे रक्त तीन वेळ बदलण्यात आले. रक्त बदलाची प्रक्रीया करण्यात डॉ. सुनील देशमुख यांना नवजात शिशू विभागाचे डॉ. उमेंद्र बोपचे, डॉ. विलास मेंढे आणि एनआयसीयू स्टाफने त्यांना सहकार्य केले.  


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...