Thursday 20 February 2020

लखनसिंह कटरे लिखित काव्यसंग्रहाचे विमोचन

आमगाव,दि.20ः-लखनसिंह कटरे (अपराधी) लिखित 'आखीर बचता तो अंधेरा ही है' या काव्यसंग्रहाचे विमोचन सेवानवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र तुरकर यांच्या हस्ते सेवानवृत्त वरिष्ठ विस्तार अधिकारी भेय्यालाल कटरे यांच्या अध्यक्षतेखाली १९ फेब्रुवारी रोजी बोरकन्हार येथे करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्याम कटरे, अँड. तिलकसिंह परधीउपस्थित होते. लखनसिंह कटरे हे मराठी साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य असून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागात जिल्हा उपनिबंधक पदावर यशस्वीपणे कार्य केले आहे. त्यांनी विविध नियतकालीन व वर्तमानपत्रात लेखन केले असून ते झाडीबोली साहित्य मंडळ साकोलीचे संस्थापक सस्य आहेत. सेवानवृत्तीनंतर ८ मराठी ग्रंथ प्रकाशित केले असून धर्मपत्नी उषादेवी कटरे यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी 'आखीर बचता तो अंधेरा ही है' या काव्यसंग्रहाचे विमोचन स्वगावी बोरकन्हार येथे करण्यात आले.
या काव्यसंग्रहात एकूण २८ कवितांचा समावेश असून काही रेखाचित्रांसाही समावेश आहे. सुरेंद्र तुरकर यांनी लखनसिंह कटरे हे मराठी भाषेच्या सानिध्यात राहूलनही त्यांचे हिंदी भाषेवर प्रभुत्व असल्याचे सांगितले. भैय्यालाल कटरे यांनी मानकर गुरुजींच्या पुण्याईमुळे आम्ही शिक्षण घेऊ शकल्याचे सांगितले. याप्रसंगी सिता रहांगडाले, मिलिंद रंगारी, श्रावणलाल ठाकूर उपस्थित होते. यावेळी मिलिंद रंगारी यांनी लखनलाल कटरे यांचा शाल देऊन सप्तनीक सत्कार केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...