Sunday 16 February 2020

जनतेचे ते ऋण फेडण्याची वेळ आली आहे : विधानसभा अध्यक्ष पटोले

अर्जुनी मोरगाव,दि.16ः राज्य व राष्ट्रीय राजकारणात जाण्याची ताकद मला अर्जुनी मोर तालुक्यासह भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील जनतेने दिली आहे. सर्वांना न्याय मिळवून देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. सत्तेचा उपयोग जनतेच्या विकासासाठी झाला पाहिजे. सत्काराच्या निमित्ताने असलेल्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करु. दर्जेदार शिक्षण, पिण्याचे पाणी, उत्तम दजार्ची आरोग्यसेवा, सुंदर रस्ते अशा जनसुविधा सोबतच मजुरांना मजुरी, सुशिक्षितांना रोजगार, शेतीवर आधारित उद्योग यासह जनतेच्या उदरनिवार्हाचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. जनतेने मला मोठे केले त्याचे ऋण फेडण्याची वेळ आता आली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
ते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १४ फेब्रुवारी रोजी आयोजित सत्कार समारोहात सत्कारमूर्ती म्हणून बोलत होते. यावेळी विविध ६१ संघटनेच्या वतीने ना. नाना पटोले व आ. मनोहरराव चंद्रीकापुरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी न्या. ज्ञानदेव परसुरामकर होते. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष भागवत नाकाडे, राकाँचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, जिप सदस्य किशोर तरोणे, शिवनारायण पालीवाल, खरेदी-विक्रीचे अध्यक्ष नामदेव कापगते, बाजार समितीचे अध्यक्ष कासिम जमा कुरेशी, नगराध्यक्ष किशोर शहारे, राईस मिल संघटनेचे अध्यक्ष मुन्ना पालीवाल, माजी जिप अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शैलेश जायस्वाल, लुनकरण चितलांगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना र्शद्धांजली वाहण्यात आली.
ना. पटोले पुढे म्हणाले की, हा परिसर शेतीवर अवलंबून आहे. शेतीसाठी विहीर व सिंचनाच्या कामांना प्रथम प्राधान्य आपण देतो. धापेवाडा प्रकल्पाचे टप्पा दोनचे काम पूर्ण झाले असून टप्पा तीनचे काम लवकरच सुरु होणार आहे. भविष्यात धापेवाडाचे पाणी नवेगावबांधमध्ये पाडण्याचे आमचे प्रयत्न आहेत. झाशीनगर सिंचन प्रकल्पातील अचडणी लवकरच दूर करण्यात येतील. सीएसआरच्या माध्यमातून जनतेच्या पैशावर सुविधा निर्माण करण्याचा आमचा विचार आहे. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून दजेर्दार शिक्षण, नवेगावबांध, गोठणगाव यासोबत प्रतापगड तिर्थक्षेत्राचा पर्यटन विकास करुन प्रतापगड यात्रा बारमाही सुरू करुन या तिन्ही क्षेत्राचे त्रिमूर्ती सर्किट तयार करुन बारमाही रोजगार उपलब्ध करुन देण्याचा आपला मानस आहे.
आ. मनोहरराव चंद्रिकापुरे म्हणाले की, सत्कार हा साक्षात्कार व चमत्कार असतो. नाना पटोले हे राष्ट्रीय व राज्यातील नेते असले तरी त्यांचा जीव व काळीज भंडारा-गोंदिया जिल्ह्यासह प्रामुख्याने अर्जुनी मोरगाव तालुक्यात आहे. अजुर्नी मोर. तालुका त्यांची कर्मभूमी आहे. जनता नाना पटोलेंवर जीवापाड प्रेम करते. शेतकर्‍यांना न्याय मिळवून देणे ही त्यांची जिज्ञासा आहे. त्यांच्या सोबतीने मी सुद्धा या विधानसभा क्षेत्राचा विकास साधण्याचा अविरत प्रयत्न करणार आहे. शिक्षण, आरोग्य, सिंचन, पिण्याचे पाणी व वीज या मूलभूत गरजांसोबतच अन्य विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. झाशीनगर एरीकेशनचे काम वनखात्याच्या मंजुरीसाठी अडलेला आहे. मंजुरीची फाईल राज्य शासनाच्या माध्यमातून भारत सरकारकडे पाठविली आहे. वन जमिनीच्या पट्टे वाटप संदर्भांत जिल्हा परिषद क्षेत्र निहाय मेळावे लावून तिथेच अतिक्रमणधारकांना पट्टी देण्याची आमची योजना आहे.
धान उत्पादक शेतकर्‍यांना २ हजार ५१८ रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात येत आहे. शेतीसाठी वीज ८ तासाऐवजी १५ ते १६ तास वीज देण्याचा आम्ही शासनस्तरावर प्रयत्न करणार आहे. अजुर्नी मोर व सडक-अर्जुनी नगरपंचायत विकासाचा प्लॅन तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. राजकीय प्रवास संघर्षमय असतो. मात्र जनतेच्या आशीवार्दाने संघषार्तून मार्ग काढण्याची आम्ही ताकत निर्माण करु, असे आश्‍वासन आ. चंद्रिकापुरे यांनी दिले. प्रास्ताविक तालुका काँग्रेस अध्यक्ष भागवत नाकाडे यांनी केले. संचालन प्रा. लक्ष्मीकांत कापगते यांनी केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...