
बैठकीत ८ डिसेंबरला झालेल्या ओबीसी महामोच्र्याचा आढावा घेण्यात आला.यात त्रुट्यापासून सर्वच गोष्टीवर चर्चा करुन दिल्ली येथील अधिवेशनात यावेळी राहिलेल्या त्र्युटा कशा दूर करण्याचे ठरविण्यात आले.सोबतच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ऑगस्टपर्यंत ओबीसी महासंघाची जिल्हा बांधणी करणे,प्रत्येक जिल्ह्यातून किमान २०० प्रतिनिधी दिल्ली अधिवेशनात नेणे,सकाळी ११ वाजेच्या दरम्यान दिल्ली येथील जंतरमंतर येथे धरणे आंदोलन करणे,महाराष्ट्र सरकारने जाहिर केलेल्या ओबीसी मंत्रालयाबद्दल अभिनंदन करीत ओबीसीच्या बजेटमध्ये लोकसंख्येच्याप्रमाणात तरतुद करणे यावर चर्चा करण्यात आली.देशातील सर्वच ओबीसी संघटनेच्या प्रमुखांशी भेट घेऊन देशपातळीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघ बळकट करण्याविषयी चर्चा करण्यात आली.राष्ट्रीय ओबीसी महासंघात महिलांना स्थान व वेळेवर येऊन चमकोगिरी करणाèया नेत्यांपासून पुढे सावध राहण्यावर उपस्थितांनी आपले विचार मांडले.प्रास्तविक सचिन राजुरकर यांनी केले.संचालन मनोज चव्हाण यांनी केले.
No comments:
Post a Comment