
स्थानिक तहसील कार्यालयासमोरील रेशीम भोजनालयामध्ये शिवथाळी भोजन योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी पुरवठा निरीक्षण अधिकारी अगळे, पुरवठा अधिकारी झोडापे, पत्रकार सुनील चोपकर, महेंद्र वैद्य, प्रितम गजभिये, सुरेश भदाडे, सुनील अग्रवाल, शिवसेना उपतालुकाप्रमुख राजेश पटले, नंदू शर्मा रेशीम भोजनालयाचे संचालक ज्योतिबा धरमशहारे आदी मान्यवर उपस्थित होते. या भोजन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दहा रुपयांत भोजन मिळेल, मात्र, कोरोना संक्रमण काळात या भोजनथाळीची किमत पाच रुपये ठेवण्यात आली आहे. देवरीमध्ये प्रारंभी 75 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ सकाळी 11 ते 3 वाजेदरम्यान घेता येईल. लाभार्थ्यांना या योजनेच्या लाभासाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment