Tuesday 21 April 2020

उद्धव ठाकरे सरकार होरपळून राख होईल-उमा भारती


Palghar mob Lynching Thackeray's government will burnt ashes: Uma Bharti hrb | उद्धव ठाकरे सरकार होरपळून राख होईल; उमा भारती संतांच्या हत्येवरून संतापल्या


नवीदिल्ली,दि.21 : पालघर मध्ये झालेल्या दोन संत आणि त्यांच्या चालकाच्या हत्येमुळे देशातील वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना या प्रकरणाला जातीय़ रंग देऊ नका असे आवाहन केले आहे.

खेळाडू, अभिनेते यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतले आहे. अखेर या घटनेचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. पालघर मॉब लिंचिंगप्रकरणी राज्य सरकारवर विश्वास नसून याचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणीही विरोधाकांनी केली आहे. या प्रकरणी अद्याप १०१ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. प्रथमदर्शनी अफवेमुळे झालेल्या गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणावरून माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. पालघरमध्ये या महान संतांच्या हत्येमध्ये ठाकरे सरकार जळून खाक होईल. या घटनेला मी कधीही विसरणार नाही, असा संताप भारती यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...