Monday 6 April 2020

दिवा लावण्याचा नादात जिवती तालुक्यात घरच जळाले



चंद्रपूर,दि.06 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी घरातील लाईट बंद करून दिवे, टार्च लावून दारात उभे राहण्याचे आवाहन केले होते.या आवाहनाला एकीकडे जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला असतानाच मात्र लावलेल्या दिव्यामुळे जिवती तालुक्यात दोन घरे जळाली. 
पाटण येथील कुंदन उईके व पल्लेझरी श्रीहरी वाघमारे यांना दिवे लावणे महागात पडले.जिवती तालुक्यातील पाटण येथील कुंदन देवराव उईके यांनी रविवारी रात्री ९ वाजता पंतप्रधानांच्या आवाहनानुसार आपल्या घरामध्ये लाईट बंद करून दिवे लावले. त्यानंतर उईके यांचे कुटुंबीय झोपी गेले. दरम्यान, रात्री १ वाजताच्या सुमारास अचानक दिव्यामुळे घराला आग लागली. काही वेळात ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरड केली असता गावातील लोकांनी पाणी टाकून आगीला आटोक्यात आणले. मात्र तोपर्यंत घरातील धान्य व जीवनावश्यक वस्तू तसेच महत्त्वाचे कागदपत्रे जळून खाक झाले. रोख रक्कम १५ हजार रुपये, एक ते दीड क्विंटल तुरी, स्वस्त धान्य दुकानातून आणलेले ५० किलो धान्य, ज्वारी, वडिलोपार्जित जमिनीचा सातबारा, जातीचे दाखले, मतदान कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक इत्यादी वस्तू आगीत जळाल्याची माहिती कुंदन देवराव उईके, विमल कुंदन उईके यांनी दिली. पाटण येथील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौधरी व बिट अमलदार साहेबराव कालापाहड यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.पल्लेझरीतील घरालाही आगजिवती तालुक्यातीलच पल्लेझरी येथील श्रीहरी वाघमारे यांच्या घरालाही रविवारी लावलेल्या दिव्यामुळे आग लागली. श्रीहरी वाघमारे यांनी रविवारी रात्री कोरोनाशी लढा देण्यासाठी आम्ही सारे एक आहोत, हा संदेश देण्यासाठी रात्री ९ वाजता घरी दिवे लावले. मात्र याच दिव्यामुळे त्यांच्या घराला आग लागली. गावकऱ्यांनी पाण्याने ही आग विझविली. मात्र आगीत वाघमारे यांचे मोठे नुकसान झाले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...