Wednesday 26 April 2017

नवेझरीच्या पांडव भातगिरणीला सहकार क्षेत्रात मानाचे स्थान

         
      व्यापारी तत्त्वाचा अवलंब करणारी विदर्भातील पहिली भातगिरणी

खेमेंद्र कटरे

गोंदिया,दि.२५- सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेक प्रकल्प-उद्योग उदयास आले खरे. पण विदर्भात या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या उद्योगांनी पाहिजे तसा ठसा व्यापार जगतात उमटवल्याची उदाहरणे ही अत्यल्पच. असे असताना पूर्व विदर्भाच्या मागास गणल्या जाणाèया गोंदिया जिल्ह्यातील एका लहानशा गावात सहकार क्षेत्राच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या भातगिरणीने ही किमया मात्र आपल्या उद्योग साधनेच्या बळावर साध्य करून दाखविली. तांदूळ उद्योगातील पॅकेqजग ही व्यापाèयांची मक्तेदारी मोडीत काढत व्यापारपेठेत स्वतःचे ब्रँड या भातगिरणीने निर्माण केले. एकीकडे अवसायनात जात असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सहकारी भातगिरण्याची संख्या वाढत असताना १० मे १९६२ ला स्थापन केलेल्या या सहकारी संस्थेची आपली घोडदौड मात्र जोमात आहे. सहकार क्षेत्रातील मानाचा पुरस्कार देऊन नुकतेच या सहकारी भात गिरणीला गौरविण्यात आले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात येणाèया नवेझरी या गावी १० मे १९६२ ला अवघ्या २० लोकांनी एकत्र येऊन दि पांडव सहकारी विपणन आणि भात गिरणी मर्यादित नवेझरी नावाची सहकारी संस्था स्थापन केली. या २० लोकांनी २० हजार ८०० एवढे भागभांडवल अवघ्या पंधरा दिवसात गोळा केले. शासनाकडून २० हजार ८०० एवढे समप्रमाण भागभांडवल मिळाले. या निधीतून संस्थेची इमारत तयार करण्यात आली.
त्या काळात नवेझरी परिसरातील शेतकèयांना आपले धान भरडाई करण्यासाठी १२-१५ किलोमीटर अंतरावरील खोपडा qकवा मुंढरी येथे जावे लागत असे. परिसरात भातगिरण्या नसल्याने शेतकèयांना फार अडचणींचा सामना करावा लागत असे. यावर तोडगा काढण्याचा निर्णय नवेझरीच्या सहकारी संस्थेच्या पदाधिकाèयांनी घेतला. त्यातून सहकारी भात गिरणी सुरू करण्याची संकल्पना पुढे आली. सन १९६९मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून ६० हजाराचे कर्ज मिळाले. यातून भातगिरणीला लागणाèया मशिनरी विकत घेतल्या. राइसमील उभी राहिली खरी. पण विजेचे साहित्य व जोडणी घेण्यासाठी संस्थेकडे भांडवल नव्हते. या अडचणीच्या वेळी  तत्कालीन अध्यक्ष बाळकृष्ण भांडारकर आणि महादेवराव हरडे यांनी संस्थेला मदतीचा हात पुढे केला. तीस हजाराची उसनवार करून अखेर २३ मार्च १९६९ ला या भातगिरणीची चाके अखेर फिरायला सुरवात झाली, ती अद्यापही अविरत फिरतच आहेत.
प्रारंभीच्या काळात २२ गावापुरते मर्यादित असलेले संस्थेचे कार्यक्षेत्र आजमितीला ५३ गावांपर्यंत विस्तारले आहे. सध्या सदस्य संख्या ३०५ एवढी आहे. शेतकèयांचे धान भरडाईच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या भातगिरणीचे संचालक मंडळ हे दूरदृष्टी बाळगणारे असल्याने त्यांनी सुरवातीपासूनच लेव्हीचे धान खरेदीला सुरवात केली. खरेदी केलेल्या धानाची संस्थेच्या भातगिरणीत भरडाई होत असल्याने नफ्यात वाढ होत गेली. पुढे १९७२ च्या सुमारास या संस्थेने ऑईलमील तर १९९० मध्ये पोहामिल, मिरची-हळद मशिन लावून आपल्या कार्याचा विस्तार केला.
महाराष्ट्र सहकारी बँकेकडून मिळालेले कर्ज आणि शासनाने दिलेले भागभांडवल या संस्थेने १९७५ पर्यंत पूर्ण परत केले. आपल्या यशाचे घोडे पुढे दामटत या संस्थेने आपले पाय व्यापारात रोवण्यास १९९४-९५ सुरवात केली. शेतकèयांना सोयीच्या दरात रासायनिक खते आणि कीटकनाशके उपलब्ध करून देण्यासाठी कृषीसेवा केंद्रास सुरवात केली. आज या संस्थेच्या मालकीचे ८ व्यापारी गाळेसुद्धा आहेत. यापैकी एका गाळ्यात बॅक भाडेतत्त्वावर सुरू आहे. गेल्या २०१०च्या सुमारास भातगिरणीचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. या माध्यमातून स्वतःच्या भातगिरणीत तयार होणारे तांदळाला पांडव या नावाने ब्रँडिग करणे सुरू केले आहे. या तांदळाचे पॅकेजिंग करून विदर्भातील ठिकठिकाणच्या व्यापारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जात आहे.
दि पांडव सहकारी विपणन आणि भातगिरणीच्या या यशस्वी घौडदौडीची दखल राज्याच्या सहकार विभागानेसुद्धा घेतली. गोंदियाचे  जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांचे संस्थेला व्यापारासाठी मार्गदर्शन लाभत आहे. या संस्थेच्या पांडव ब्रँड तांदळाचे पॅqकग पश्चिम महाराष्ट्राच्या व्यापारपेठेत पोचविण्यासाठी संदीप जाधव प्रयत्नशील आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील नवेझरी सारख्या छोट्या खेड्यात निर्मित पांडव ब्रँड तांदूळ आता मुंबई-पुणेकरांच्या चवीचा लवकरच भाग बनेल, यात शंका नाही. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...