देवरी,ता.17(सुजीत टेटे)- येथून 10 किलोमीटर अंतरावरील मुल्ला येथे काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास तणसीच्या ढिगांना आग लागल्याची घटना घडली. यामध्ये सुमारे 50 हजाराचे गुरांचे वैरण बेचिराख झाले.
सविस्तर असे की, मुल्ला या गावातील तलावाच्या काठाने असलेल्या शेतीमध्ये गावातील काही शेतकऱ्यांनी गुरांचे वैरण असलेल्य़ा तणसाचे ढिग लावून ठेवले होते. काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास या ढिगांना अचानक आग लागल्याने आगीने उग्ररुप धारण केले होते. परंतु, गावकऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने ही आग आटोक्यात आली. परिणामी, मोठी वित्तहानी टळली. या आगीत परिसरात असलेल्या शेणखतांच्या खड्ड्यांना आग लागून मोठे नुकसान झाले. रात्री उशीरा पर्यंत आग विझविण्याचे कार्य गावकरी करीत होते.
शासनाने शेतकऱ्यांना आगीत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी होत आहे. या आगीत तणीस जळाल्याने गुरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
सविस्तर असे की, मुल्ला या गावातील तलावाच्या काठाने असलेल्या शेतीमध्ये गावातील काही शेतकऱ्यांनी गुरांचे वैरण असलेल्य़ा तणसाचे ढिग लावून ठेवले होते. काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास या ढिगांना अचानक आग लागल्याने आगीने उग्ररुप धारण केले होते. परंतु, गावकऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने ही आग आटोक्यात आली. परिणामी, मोठी वित्तहानी टळली. या आगीत परिसरात असलेल्या शेणखतांच्या खड्ड्यांना आग लागून मोठे नुकसान झाले. रात्री उशीरा पर्यंत आग विझविण्याचे कार्य गावकरी करीत होते.
शासनाने शेतकऱ्यांना आगीत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी होत आहे. या आगीत तणीस जळाल्याने गुरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
No comments:
Post a Comment