Friday 28 April 2017

शेतकरी कुटुंबातील तिघांनी विष घेतले

यवतमाळ,दि.28 : शेतजमिनीवर ताबा करण्यात येत असल्याच्या कारणावरून दारव्हा तालुक्यातील डोल्हारी येथील शेतकरी कुटुंबातील तिघांनी जिल्हाधिकार्‍यांच्या कक्षासमोर विष प्राशन केले. ही घटना गुरुवार, २७ एप्रिल रोजी घडली. उमेश दत्तसिंग गौतम (२८), कुंदन रामचंद्र गौतम (१७), आशिष अरुण गौतम (३२) अशी विष प्राशन करणार्‍यांची नावे आहेत. येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तिघांवरही उपचार सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल सभागृहामध्ये प्रभारी जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत दुपारी नागरिकांच्या अडचणी जाणून घेत होते. दरम्यान निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकरी कुटुंबातील तिघांनी विष प्राशन केल्याचा प्रकार घडला. याची माहिती शिपायाने वरिष्ठांना दिली. तिघांनाही कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान प्रभारी जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, दारव्हा एसडीओ जयंत देशपांडे, यवतमाळ एसडीओ राजेंद्र देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे, तहसीलदार सचिन शेजाळ, एसडीपीओ पीयूष जगताप आदींनी रुग्णालय गाठले. सोनू गौतम याला आत्या मृतक सरस्वती बैस यांनी २ हेक्टर ८ आर शेती वाटणीपत्र करून दिली होती. तो अज्ञान असल्यामुळे सदर शेतजमीन वडील यांच्या ताब्यात आहे. दरम्यान, गंगा इंद्रबहाद्दूर ठाकूर, रवी जनकवार, अमोल ठाकूर (रा. सर्व धामणगाव रेल्वे, जि. अमरावती) यांनी जमिनीवर अवैधरीत्या ताबा करण्याचा प्रय▪केला. यामध्ये दारव्हा ठाणेदारही सहभागी असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...