Saturday 29 April 2017

सरपंचांवर अविश्वास आणणार्यांना चपराक

सरपंचपदी सविता तरोणे कायम : सत्याची बाजू जिंकल्याची चर्चा
आमगाव,दि.29 : तालुक्यातील चिरचाळबांध येथे पुरेशी सदस्यसंख्या नसताना देखील वारंवार सरपंचांवर अविश्वास आणण्याचा प्रयत्न केला गेला. ६ मार्च २०१७ रोजी अविश्वासाकरिता सभा बोलावण्यात आली. तहसीलदारांवर राजकीय दबाव आणण्यात आला.  त्यात तहसीलदारांनी देखील अविश्वास प्रस्ताव पारीत केला. सरपंच आणि त्यांच्या साथीला असलेल्या सदस्यांनी अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागीतली. दरम्यान १५ एप्रील रोजी सरपंचांच्या बाजूने निकाल आला. या निकालामुळे सत्याचा विजय झाल्याची चर्चा तालुक्यात आहे.
चिरचाळबांध येथील ग्रामपंचायतीची निवडणूक २७ जुलै २०१५ रोजी पार पडली. सरपंच पदाकरिता १ आॅगस्ट २०१५ रोजी मतदान घेण्यात आले. त्यात सविता बळीराम तरोणे यांची सरपंच म्हणून निवड झाली. सर्वकाही सुरळीत सुरू  असताना काही सदस्यांच्या पोटात पोटशूळ उठले. त्यांनी अवघ्या सहा महिन्यात अविश्वास आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. पुन्हा सहा महिन्यानंतर अविश्वास आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र एकूण नऊ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीतील तीन सदस्यांनी निवडणूक विभागाकडे कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याने त्यांना अपात्र घोषीत करण्यात आले. अविश्वास प्रस्ताव पारीत करण्याकरिता ठरवून दिलेल्या सदस्यसंख्येपेक्षा कमी संख्या असताना देखील ६ मार्च तहसीलदारांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. राजकीय दबाव असल्यामुळे तहसीलदारांनी अविश्वास प्रस्ताव पारीत केला. हा निर्णय अयोग्य असल्याचे कारण पुढे करून सरपंच सविता तरोणे आणि त्यांच्यासह असलेल्या एका सदस्याने ७ मार्च रोजी अपर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात धाव घेतली. अपर जिल्हाधिकारी यांनी यांनी पÑकरणाची तपासणी करून अविश्वास प्रस्ताव निरस्त करून सरपंचपदी सविता तरोणे कायम राहतील, असा निर्वाळा १५ एप्रील रोजी दिला.
ग्राम विकासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न चिरचाळबांध येथील काही मंडळी नेहमी करतात. सरपंच सविता तरोणे यांच्या बाबतीत देखील असेच झाले. मात्र, त्यांचा कारभार आणि प्रशासन अगदी स्वच्छ असल्यामुळे त्यांचीच बाजू वरचढ ठरली. त्यांच्या विरोधकांना मात्र चांगलीच चपराक बसल्यामुळे चिरचाळबांध येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...