Tuesday 18 April 2017

न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करूः खान कुटुंबीयांचा इशारा



नवी दिल्ली, ता. 18 - हरियाणा येथील दुग्धउत्पादक शेतकरी पेहलू खान यांची गो तस्कर म्हणून कथित गोरक्षकांनी काही दिवसांपूर्वी हत्या केली.  याप्रकरणी न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करणार, असा आक्रमक इशारा पेहलू खान यांच्या कुटुंबीयांनी दिला आहे. 
 'घटना घडून दोन आठवडे लोटले मात्र तरीही मुख्य आरोपीला अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही', असे सांगत पेहलू यांचा भाचा अब्दुल कयूम यानं तपासावर नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय, यावेळी आत्मदहनाचा इशाराही दिला. 
 कयूम आणि त्यांचे अन्य नातेवाईक नागरिक अधिकार संघटना पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज यांच्या नेतृत्वात होणा-या निदर्शनात सहभागी होण्यासाठी जयपूर येथे आले होते. यावेळी कयूम यांनी सांगितले की, 'आम्हाला मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची भेट घ्यायची होती. मात्र त्या ओडिशामध्ये असल्याचे आम्हाला माहिती नव्हते.  जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही जयपूरमध्ये येत राहणार'.
 तर दुसरीकडे पेहलू यांचे काका हुसैन यांनी सांगितले की, 'जर पेहलू यांना जयपूर किंवा गुडगाव येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचू शकला असता. दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबीय दहशतीखाली आहे. पेहलू यांची मुल इरशाद आणि आरिफ दोघंही अजून सावरू शकलेली नाहीत'. 

हरियाणातील मेवात येथील दुग्धउत्पादक शेतकरी पेहलू खान (५५) यांनी दुभती म्हैस विकत घेण्याऐवजी दुभती गाय विकत घेतली आणि त्यांना तस्कर समजून कथिक गोरक्षकांनी ठारच मारले.  पेहलू खान यांना गाईंची तस्करी करत असल्याच्या आरोपाखाली काही जणांकडून भररस्त्यात मारहाण करण्यात आली. या मारहाणीत जबर जखमी झालेल्या पेहलू खान यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.  पेहलू खान यांच्यासहित एकूण पाच जणांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...