Thursday 27 April 2017

आता धान पिकाचे होणार लसीकरण!



सुरेश भदाडे


गोंदिया, दि.२५- शीर्षक वाचून दचकू नका! ज्याप्रमाणे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांना वेगवेगळ्या रोगांविरुद्ध लढता यावे, म्हणून लसीकरण केले जाते. अगदी त्याच प्रमाणे पिकांना लसीकरण करणे आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. येत्या खरीप हंगामात धान पिकाला लसीकरण करण्याचे उदिष्ट्ये ठेवण्यात आले आहे.
आरोग्य शास्त्राप्रमाणे, मानवाला होणाèया दुर्धर आजाराविरुद्ध आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर अगदी बाल्यावस्थेपासून लसीकरण केले जाते, याविषयी सर्वांनाच माहिती आहे. अगदी शून्य वयोगटापासून ते अठरा वर्षाच्या बालकांना वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यानुसार आरोग्य विभागामार्फत वा खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून लसीकरण केले जाते. यामुळे मनुष्याचे सरासरी जीवनमान उंचावले आहे. याशिवाय लसीकरणाच्या माध्यमातून अनेक आजारांना हद्दपार करणे सुद्धा शक्य झाले आहे.
वनस्पतींच्या बाबतीतही हे शक्य आहे. यावर आजच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून निरनिराळे प्रयोग केल्यानंतर शास्त्रज्ञांना यात यश आले आहे. पिकांच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास आज शेतकरी पिकांवर पडणाèया रोगांमुळे हैराण आहेत. हजारो रुपयांचे रासायनिक खत असो वा महागडे कीटकनाशके यांचा वापर करूनही रोगांमुळे शेतकèयांच्या हाती पाहिजे तसे पीक येत नाही. त्यातून त्यांना प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागतो. यामुळे शेतकèयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.या सर्व बाबींवर अगदी वेळेवर उपाययोजना केली तर शेतकèयांना आर्थिक नुकसानीतून बाहेर काढणे शक्य आहे, तेही अगदी अल्प खर्चात.
पारंपरिक शेती पद्धतीमध्ये खताचा डोस देताना अनेक त्रुट्या राहतात. त्याचप्रमाणे रोग पडल्यास लागणारा खर्च हा अधिक असतो. त्याचे प्रमुख कारण म्हणजे हे पीक प्रौढ होत जाऊन त्याच्या क्षेत्रफळातसुद्धा वाढ झालेली असते. त्यामुळे औषधांचा खर्च आणि प्रत्यक्ष देखभालीचा त्राससुद्धा वाढलेला असतो. त्यामुळे हे पीक बाल्यावस्थेत असताना त्याला पुढे कोणत्याही रोगाची लागण होऊ नये, यासाठी पिकांच्या लसीकरणाचा विचार पुढे आला आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी लागवडी खालील क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. त्यानुसार, खरीप हंगाम २०१७ साठी १ लाख ८८ हजार ८७० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामासाठी १ लाख ८८ हजार ४०१ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. त्यासाठी ४१ हजार ९५४ qक्वटल बियाण्यांची मागणी होती. खरीप हंगाम २०१७ साठी कृषी विभागाप्रमाणे भातपीक लागवडीसाठी १ लाख ८८ हजार ८७० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे.                        
 धानपिकाला ही लसीकरण होणार     
                   
बालकांच्या लसीकरणाप्रमाणे आता धानाच्या रोपट्यांनाही लसीकरण करून भविष्यातील होणाèया रोगांपासून बचावासाठी लसीकरण मोहीम येत्या मे च्या पहिल्या दिवसापासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सुमारे ९० हजार शेतकèयांपर्यंत पोचविण्याचे उदिष्ट्ये ठेवण्यात आले आहे. ही जबाबदारी महाराष्ट्रातील गोंदिया येथील कृषी क्षेत्रात काम करणारी संस्था यासाठी कृषी विषयात पदवी पदव्युत्तर झालेल्या मुलांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे. यासाठी गोंदियाच्या रुची ग्रुपने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाचा फायदा जिल्ह्यातील २ लाख ४८ शेतकèयांना मिळणार आहे.                        

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...