Thursday 26 December 2019

स्त्रियांचे दुःख ओबीसी महिलांनी पहिल्यांदाच मांडले-प्रा.विजया मारोतकर

नागपूर,दि.26ः- अनादी काळापासून समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान देण्यात आले.प्रत्येक जातीत स्त्रियांना शोषण, समस्या आणि दुखांचाच सामना करावा लागला. मोठ्या प्रमाणात असलेल्या ओबीसी समाजातील स्त्रियांनीच महिलांचे हे दुःख सर्वप्रथम साहित्यातून व्यक्त केले. पण श्रेष्ठत्त्व आणि पुरुषी मानसिकतेच्या आधिपत्याखाली या साहित्याला प्रतिष्ठाच मिळाली नाही. आता हे साहित्य नव्याने समोर आणून ते लिहिणाèया महिला साहित्यिकांचा सन्मान व्हावा, असे कळकळीचे आवाहन प्रख्यात कवयित्री आणि लेखिका प्रा. विजया मारोतकर यांनी केले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने बजाजनगर येथील कस्तुरबा भवनातील लोकमान्य टिळक सभागृहात दोन दिवसीय फुले-शाहू-आंबेडकर पहिले ओबीसी महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.त्याप्रसंगी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या.

जगातील सर्वच माणसांचे रक्त लाल आहे आणि रक्ताची तपासणी करून कुणाच्याही जाती, धर्माची विभागणी करता येत नाही. पण तरीही जातींच्या आधारावर होणारा भेदभाव आणि श्रेष्ठ-कनिष्ठता काही केल्या संपत नाही, ही शोकांतिका आहे. ओबीसी महिला साहित्यिकांनी अनेक शतके हा भेदभाव भोगला आहे. त्यामुळे त्यांनीच समाजातून ही जात हद्दपार करण्यासाठी मानवी मुल्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आता लेखन करण्याची नितांत गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ओबीसी समाज मोठा असून आणि याच समाजाने आजपर्यंत नेतृत्त्व केले आहे. यानंतरचे भविष्य स्त्रियांचेच आहे. साहित्य निर्मितीची लेखनकळा तपासताना आपण अधिक सकस आणि गुणवत्तापूर्ण लेखनाचा विचार करायला हवा. त्यासाठी आत्मटिकाही करता आली पाहिजे आणि इतरांच्या लेखनाचे, विचारांचे कौतुकही करता आले पाहिजे. अशी संतुलित लेखणीच समाज जागृतीचे कार्य करू शकते, असे त्या म्हणाल्या.स्त्रियांना आता त्यांच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या शक्तीची प्रचिती आली आहे. ही जाणीव संपूर्ण समाजात प्रवाहित करण्याचे कार्य स्त्रियांच्या लेखणीतून होण्याची गरज आहे. पुरुषांचीही मानसिकता बदलविण्याचे सामथ्र्य स्त्रियांच्या विचारात आहे. कारण पुरुषाला घडविणारी एक स्त्रीच आहे. एकूणच या दृष्टीने लिखाण करताना संपूर्ण समाजच सकारात्मकतेने भारून टाकण्याचे सामथ्र्य ओबीसी समाजातील स्त्रियांचे आहे. हे सामथ्र्य अधिक ताकदीने आता समोर येईल,असा विश्वास यावेळी मारोतकर यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...