Tuesday 17 December 2019

शेतकèयांवर पुन्हा अस्मानी संकट




गोंदिया,दि.17ः हवामान खात्याने पावसाचा कोणताही अंदाज वर्तविलेला नसतानाही रविवार, १५ डिसेंबर रोजी रात्री जिल्ह्यात पावसाने सर्वत्र हजेरी लावली. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत एकूण १३०.१० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसाने शेतात कापणी करून ठेवलेल्या व हमीभाव केंद्रावरील उघड्यावरील धानाला मोठा फटका बसणार असल्याने शेतकèयांसमोरील चिंता वाढल्या आहेत.
यंदा जिल्ह्यातील शेतकèयांना अस्मानी व सुलतानी दोन्ही संकटांना सामोरे जावे लागत आहे. खरिपाच्या हंगामात सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस झाल्याने उत्पादनात वाढ होण्याची आशा शेतकèयांना होती. मात्र परतीच्या पावसाने त्यांच्या आशेवर पाणी फेरले. शासन व प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा असताना प्रशासन सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत गुंतले होते, तर लोकप्रतिनिधी जाहीर सभांमध्ये आश्वासने देण्यात व्यस्त होते. अशातच दिवाळीसारख्या सण तोंडावर आला. मात्र शेतकèयांच्या समस्येकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. परिणामी शेतकèयांना नाईलाजास्तव दिवाळी सण साजरा करण्यासाठी व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी व्यापाèयांना कमी भावात धान विकावे लागले.निवडणुका संपताच शासन व प्रशासन समस्यांकडे लक्ष देईल,अशी आशा ठेवत शेतकèयांनी शेतात शिल्लक असलेल्या धानाच्या कापणी व मळणीला सुरुवात केली. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने धानपिकाला पुन्हा फटका बसला.आता धान विकण्यासाठी हमीभाव केंद्रांवर नेण्यास तयार असताना व नेलेला असताना गत तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण व १५ डिसेंबर रोजी जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला. जिल्ह्यात एकूण १३०.१० मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून, गोंदिया तालुक्यात १४.४० मिमी, गोरेगाव ३२.४०, तिरोडा २५.२०, अर्जुनी मोर १०.००, देवरी ५.४०, सालेकसा ९.६० व सडक अर्जुनी तालुक्यात ४.४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे शेतात कापणी करून ठेवलेल्या व हमीभाव केंद्रांवर विक्रीसाठी ठेवलेल्या धानाची पाखड होण्याची शक्यता जास्त आहे. पाखड झालेले धान संबंधित यंत्रणेकडून विकतही घेतले जात नाही. त्यामुळे कर्जबाजारी होऊन घेतलेल्या खरिपाच्या पिकातून किती पैसा हाती पडेल, ही चिंता शेतकèयांना लागली आह
तुमसर-सिहोरा- बपेरा परिसरात रविवारी (दि.१५) सायंकाळी वादळीवार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतातील पिकांसह उघड्यावर ठेवण्यात आलेल्या सहकारी राईस मिल तथा धान केंद्रावरील धानाचे नुकसान झाले. बहुतांश शेतकरी पावसाच्या घाईने मळणी करताना अर्धवट राहिलेल्या गंज्यांना उघड्यावर असल्याचे चित्रपहावयास मिळत आहे.
परिसरात धान बांधणी व मळणीचे काम मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. सिंचनाची सोय असलेल्या रबी पिकांची पेरणी सुरू आहे. रविवारी संध्याकाळी व सोमवारी सकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसासह गारांनी शेतातील तूर, लाखोळी, जवस, पोपट तथा अन्य भाजपाला पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सुमारे तासभर पावसाची रिपरिप सुरू होती. धान खरेदी केंद्रावर तथा सहकारी राईस मिलांवर उघड्यावरच असलेली धानाची पोती ओलीचिंब झाल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. बहुतांश शेतकरी पावसाच्या घाईने मळणी करताना अर्धवट राहीलेल्या गंज्यांना उघड्यावर ठेवल्याचे चित्र आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...