Wednesday 25 March 2020

आज रात्री 12 पासून देशभरात 21 दिवस लॉकडाऊन – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली,दि.24ः- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित करत आज रात्री 12 वाजेपासून देशात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पीएम मोदी म्हणाले, निष्काळजीपणा केल्यास भारताला याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल. ही किती मोठी किंमत असेल त्याचा अदाजही लावता येणार नाही. देशात गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या प्रयत्नांना गांभीर्याने घ्यायला हवे. आरोग्य क्षेत्रातील अनुभव लक्षात घेता, देशात महत्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. त्यासाठीच आज रात्री 12 वाजल्यापासून देशभर लॉकडाउन जारी केला जात आहे.तो 14 एप्रिलच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत राहणार आहे.
भारताला वाचवण्यासाठी, प्रत्येक नागरिकाला वाचवण्यासाठी, तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला वाचवण्यासाठी आज रात्रीपासून घराबाहेर पडण्यावर पूर्णपणे बंदी लावली जात आहे. राज्य, केंद्र शासित प्रदेश, प्रत्येक जिल्हा, गाव, वस्ती आणि गल्लीत सुद्धा लॉकडाउन केले जात आहे. हा एक प्रकारचा कर्फ्यू आहे. जनता कर्फ्यूपेक्षा अधिक सक्तीचा. कोरोनाच्या विरोधात निर्णायक लढा देण्यासाठी हे पाउल उचलणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...