इटखेडा व बोंडगावदेवी येथील सरपंच,सचिवासह इतरावर गुन्हे दाखल

जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे यांनी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार रद्द करण्याचे निर्देश दिले होते.त्यानंतरही त्या सर्व ठिकाणी बाजार भरविण्यात आले.सोबतच सौंदड ग्रा.प.ने पालन केल्याचे दिसत नाही.ग्रा.प.ने २५ मार्चला बुधवारला आठवडी बाजार भरवला.या बाजारात मोठी गर्दी दिसून येत होती.मात्र याकडे पोलीस विभागाने सुद्धा लक्ष दिले नाही.यामूळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.सडक अर्जुनी तालुक्यातील आठवडी बाजार दोन आठवडे बंद करण्याचे आदेश तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार सडक अर्जुनी यांनी दिले असतांनी सुध्दा सौंदड येथील आठवडी बाजारात दुकाने थाटण्यात आली होती.कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी व प्रतिबंध उपाय म्हणून सडक अर्जुनी तालुक्यातील आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश १६मार्चला तहसीलदार सडक अर्जुनी यांनी सर्व ग्रा.प.ला बजावले होते.सौंदडचे सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी आठवडी बाजार लावण्यास मनाई केली नाही.भाजी विक्रेत्यांनी ग्रामीण रुग्णालयापासून सुंदरी रोडापर्यंत दुकाने थाटली होती.यासंदर्भात उपाय योजना करण्यासाठी पोलिस विभागाने काही ठोस पावले उचलली नाही.यामुळे नागरिकाकडूनरोष व्यक्त केला जात आहे.
No comments:
Post a Comment