Saturday 28 March 2020

‘लॉकडाऊनचा कालावधी वाढणार’ ; २१ दिवसाहून थेट ३ महिने करण्याचा सरकारचा विचार

(डेस्क न्युज बेरार टाईम्स)ः सध्या पूर्ण राज्यामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. पूर्ण राज्यासहित देशात देखील लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे कोरोना विषाणूला आवरणे सरकारला सोपे पडत आहे. सरकार विषाणूला रोखण्यासाठी योग्य ती कारवाही केली जात आहे. या लॉकडाऊन मध्ये नागरिकांना घराच्या बाहेर पडता येत नाही.घराच्या बाहेर पडला की पोलीस कारवाहीला सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊन पालन करत आहेत. ३१ मार्च पर्यंत कोणीही घराच्या बाहेर पडू नये असे आदेश राज्य सरकारने दिले होते त्यानंतर या प्रकरणाची गांभीर्यता पाहता, केंद्र सरकारने २१ दिवस म्हणजे १४ एप्रिल पर्यंत कालावधी वाढवला.
मात्र सध्या सरकार हा २१ दिवसांचा कालावधी वाढविण्याचा विचार करत आहे. कोरोना विषाणूची सध्याची परिस्थिती जर अशीच राहिली, तर हा कालावधी २१ दिवसांहून ३ महिन्यांपर्यंत करण्यात येणार असल्याचा, सरकारचा विचार आहे. या २१ दिवसापर्यंत जर विषाणू कमी नाही झाला तर हे ३ महिने कालावधी वाढविण्याचा विचार सरकार करत आहे.यामुळे सरकारच्या सूचनांचे पालन करायला सरकार सांगत आहे. कोणीही घराच्या बाहेर पडणार नाही. बाहेर पडल्यावर कठोर कारवाही होणार आहे. त्यामुळे नागरिक सध्या घरात बसून पूर्णपणे लॉकडाऊनला सहयोग करताना दिसत आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...