Sunday 25 March 2018

कार्यकर्त्यांनो, जनहिताची कामे करा-खा.पटेल

गोरेगाव,दि.२५ : निवडणुकीपूर्वी जनतेला मोठ मोठी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्यातील सरकारने एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. जनतेला केवळ मोठी मोठी स्वप्ने दाखवून स्व:हित साधण्यावर या सरकारने भर दिला. त्यामुळे या खोटारड्या आणि संधीसाधू सरकारचा खरा चेहरा आता जनतेपुढे आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्र्यांनी शेवटच्या घटकापर्यंत पोहचून त्यांच्या समस्या मार्गी लावून जनहिताची कामे करावी. असे आवाहन खा. प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी (दि.२३) येथे केले.
स्थानिक शारजा लॉन येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी कार्यकत्र्याना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. राजेंद्र जैन, माजी आ. दिलीप बन्सोड, राकाँ जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे,युवका आघाडी किशोर तरोणे,केतन तुरकर, जिल्हा सचिव गोविंद खंडेलवाल, लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, नगरसेवक रुस्तम येळे, जि.प.सदस्या ललीता चौरागडे, राकाँ तालुकाध्यक्ष केलवराम बघेले, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, बाबा बहेकार, जि.प. गटनेता गंगाधर परशुरामकर,पंचम बिसेन विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष कमलेश बारेवार, माजी पं.स.सदस्य डुमेश चौरागडे, प्रदीप जैन, विना बिसेन, प्रिती रामटेके, सुनिता मडावी, अनिता तुरकर, छाया हुकरे, नामदेव डोंगरवार, किशोर तरोणे उपस्थित होते.
पटेल म्हणाले, सध्या सत्तेत असलेले सरकार म्हणजे जनतेला भुलथापा देणारे सरकार आहे. शेतकèयांची कर्ज माफी असो, शेतक?्यांना देण्यात येणाक्तया सुविधा असो यासाठी अनेक अडचणी निर्माण करुन गोरगरीबांना लाभापासून वंचित ठेवण्याचे काम विद्यमान सरकारकडून केले जात आहे. या सरकारचा खरा चेहरा उघड करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्र्यांनी करण्याचे आवाहन करित त्यांनी कार्यकत्र्यांमध्ये जोश भरला. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर असो वा नसो आमच्या पक्षाने नेहमीच जनतेच्या हिताला प्राधान्य देण्याचे काम केले आहे. निवडणुकीपूर्वी विकास कामे करुन परिसराचा कायापालट करु असे सांगणाèयांनी सांगता येईल असे एकही विकास काम केले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
बन्सोड यांनी कार्यकत्र्यानी आपल्या तालुक्यातील गावागावातील प्रभाग वॉर्ड, बुथ संघटन बळकट करण्यासाठी काम करावे . हे कार्य करत असतानाच शेतक?्यांना, गोरगरीब लाभाथ्र्यांना होत असलेल्या त्रासाबाबत विचारणा करुन त्यावर तोडगा काढून द्यावा. गाव पातळीवर संघटन मजबूत करावे. या वेळी माजी विजय शिवणकर, गंगाधर परशुरामकर, मनोहर चंद्रिकापुरे यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी तालुक्यातील अनेक गावात आघाड्या स्थापन करुन जनसंपर्क वाढविण्याचे कार्य कार्यकत्र्यांना देण्यात आले. नवयुवकांच्या नावाच्या नोंदणीसह मतदार याद्या तयार करुन त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा. यासाठीही कार्यक्रम तयार करण्यात आला.गाव प्रमुखाकडे ही जबाबदारी देण्यात आली. कार्यकर्ता मेळाव्याला हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...