काहीही झाले तरी आरक्षणाचा हक्क गमावू नका, असेही कल्याण सिंह यांनी यावेळी सांगितले. आपण घटनात्मक पदावर असल्याने राजकारणाबाबत वक्तव्य करू शकत नाही. मात्र सामाजिक विचार जरूर व्यक्त करू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
'आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष माजी दिवंगत पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी खूप संघर्ष केलेला आहे. त्यांनी मंडल आयोग लागू केला. त्यावेळी देशात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. आंदोलने झाली, रक्तसुद्धा वाहिले, परंतु त्यांनी कशाचीही पर्वा न करता मंडल आयोग लागू केला. त्यांच्यामुळेच आज तुम्हाला आरक्षण आहे, असे त्यांनी व्ही. पी. सिंग यांच्याविषयी सांगितले.
कुठल्याही वर्गाला आरक्षण मिळाले तरी आपल्याला त्याची चिंता नसावी, परंतु आपला आरक्षणाचा हक्क कोणी हिरावून घेत असेल, तर आपण शांत बसता कामा नये, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment