मुंबई,दि.04– कोरेगाव भीमा हिंसाचारातील मुख्य आरोपी मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करावी, अन्यथा येत्या पावसाळी अधिवेशनात विधानभवनाला घेराव घालू, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. मिलिंद एकबाेटे अाणि भिडे यांना सरकार अाणि मुख्यमंत्री जाणीवपूर्वक पाठीशी घालत अाहेत. त्यांना वाचवण्यासाठी भाजपने तथाकथित सत्यशाेधन समिती तयार केली अाहे. ही समिती मुख्य अाराेपीवरून लक्ष विचलित करून दिशाभूल करण्याचे काम करीत असल्याचा अाराेप संभाजी ब्रिगेड संघटनेचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.ते म्हणाले, भिडेंची शिवप्रतिष्ठान ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उपसंघटना आहे. ते मनुवादी विचारसरणीचे आहेत. त्यामुळे जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करून तरुणांची माथी भडकावण्याचे काम करत अाहेत. कारेगाव भीमा उद्रेकाच्या माध्यमातून महाराष्ट्रात दंगली घडवण्याची याेजना हाेती. मात्र, संभाजी ब्रिगेड अाणि परिवर्तनवादी संघटनांनी एकत्र येऊन हे थांबवले. परंतु तरी त्यांची याेजना अाहे. त्यामुळे भिडेंना अटक करून त्यांची चाैकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
तिरोडा,दि.४ मेः-भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिरोडा येथे लोकसभा पोटनिवडणुकीला घेऊन कार्यकर्ता मेळावा व जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राज्या...
No comments:
Post a Comment