गोंदिया,दि.15 : वाढत्या चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाने लांब पल्ल्यांच्या काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा बलासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची जोड असणार आहे.रेल्वे गाड्यांमध्ये चोरांनी हैदोस घातला आहे. विशेषत: चोरट्यांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांना लक्ष्य केले आहे. परिणामी चोरट्यांसह खिसेकापूंवर पाळत ठेवण्यासाठी डब्यांमध्ये दर्शनी भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून प्रवाशांची सुरक्षितता केली जाणार आहे. रेल्वे गाड्यात चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्यात रेल्वे सुरक्षा बलाला अपयश आल्याबाबत यंत्रणेवर टीका होत आहे. यापूर्वी रेल्वे प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर मुंबई ते दिल्ली राजधानी एक्सप्रेसच्या चार डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रयोग यशस्वी केला.आता लांब पल्ल्यांच्या गाड्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाहून सुटणाºया काही महत्त्वाच्या गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहे. यात भुसावळ, नागपूरमार्गे ये- जा करणाºया रेल्वे गाड्यांचा समावेश असणार आहे. हावडा-मुंबई मेल, मुंबई-हावडा गितांजली एक्सप्रेस, कुर्ला-हावडा शालीमार एक्सप्रेस, गोंदिया-मुंबई विदर्भ एक्सप्रेस, हावडा-मुंबई सुपर डिलक्स एक्सप्रेस या गाड्यांमधील डब्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रवाशांची सुरक्षितता होणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया। संपूर्ण महाराष्ट्र प्रदेश में सबसे ज्यादा गंभीर स्थिति और कोरोना का हमला पुरा महाराष्ट्र प्रदेश झेल रहा है, एैसी स्थिति में राज्...
-
नवेगावबांध,दि.21: व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली मोठी कीड आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक तरुण वाईट मार्गाला लागत आहे. गावातील अवैध ध...
No comments:
Post a Comment