Friday 8 November 2019

अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांचा राजीनामा मंजूर


मुंबई,८ -राज्यातील सत्तेचा तिढा काही केल्या सुटण्याचे नाव नाही. या सत्ता संघर्ष अगदी टोकावर पोचताच राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सुपूर्द केला. यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी राज्यपाल यांनी राजीनामा मंजूर केल्याची माहिती दिली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप , राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. याशिवाय आघाडीतील सर्व घटकपक्षांच्या नेत्यांचे सु्ध्दा फडणवीस आभार मानायला विसरले नाही. राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची शंका व्यक्त केली जात आहे.  आघाडी चे शासन राज्यात येण्याची शक्यता मावळत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, जनतेनी मला सेवा करण्याची संधी दिली. या पाच वर्षाच्या कालखंडात त्यामी अनेक संकटांवर मात करून राज्याला प्रगतिपथावर नेण्याचे कार्य केले. दुर्दैवाने या पाच वर्षाच्या काळात सुमारे 4 वर्षे राज्यात दुष्काळी परिस्थिती होती. त्यांच्या सरकारने राज्यात अनेक महत्वाचे धोरण आखण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...