Saturday 9 November 2019

वडेगाव ग्राम पंचायतीचा अनागोंदी कारभार;पाण्याच्या टाकीत आढळले कुजलेले उंदीर

डक अर्जुनी,दि.09ः- सडक अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वडेगांव येथील ग्राम पंचायतीच्या बेजबाबदारपणामुळे गावातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. वडेगाव ग्राम पंचायत अंतर्गत जनतेला जुन्या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून एका वॉर्डातील अंदाजे २०० नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा केला जातो त्या टाकीत आज (ता.९) ला सकाळी ७ वाजता  ८ ते १० उंदीर व पाली मेलेल्या व अळी झालेल्या अवस्थेत काही नागरिकांना आढळून आले. त्याची माहिती गावचे सरपंच, ग्रामसेवक, व पंचायत समितीचे उपसभापती, आरोग्य कर्मचारी यांना बोलावून लोकांनी माहिती दिली. दरम्यान, पाण्याची टाकी महिन्यातून एक वेळा साफ केल्याची माहिती पाणी वाटप कर्मचारी वीरेंद्र मेंढे यानी दिली.
गेल्या २० वर्षापासून ह्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून संपूर्ण वॉर्डत पिण्याच्या पाण्याची सोय केली जात आहे. आता मागील वर्षी पासून मोठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू केल्याने ,ह्या जुन्या पाणी पुरवठा योजना कडे दुर्लक्ष करून पाणी पुरवठा केला जात आहे. दुर्लक्ष केल्याने ,त्या टाकीत उंदीर, पाली मरून त्यांना अळी लागल्या आहेत. त्या टाकीत पाणी आजही वॉर्डातील लोक पाणी पितात हे विशेष. सदर माहिती मिळताच बहुतेक महिलांनी घरचा स्वयंपाक केला होता , त्यामुळे कुणी भाजी फेकून दिल्याची माहिती आहे . काल ता.८ ला गावात मंडई असल्याने बहुतेक गुपचूप विक्रेत्यांनी ह्याच टाकीच्या पाण्याचा वापर करून गुपचूप विक्रीचां व्यवसाय केला. त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. साद्या शेतीचा हंगाम असल्याने बहुतेक मजुरांनी शेतात जातांना , पिण्याचे पाणी ह्या टाकीतून घेऊन गेले आहेत. ही भयंकर पाणी समस्या लक्षात आली नसती ,तर त्या मलेल्या विषारी कीटकांचे पाणी प्यावे लागते असते. गोर गरीब जनतेला विविध आजाराशी सामना करावा लागला आहे. पंचायत समिती चे विस्तार अधिकारी हे कधीच गावाला भेटी देत नाहीत, ते फक्त विजीट बुक पंचायत समिती ला बोलावून विजिट लिहिल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याही अधिकाऱ्यांवर कारवाही ची मागणी नागरिकांनी केली आहे.
या प्रकरणात आरोग्य कर्मचारी कुठेही लक्ष न देता फक्ट विझिट बुक लिहून मोकळ्या होतात. त्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी  केली आहे.

वडेगाव ग्राम पंचायत येथे एक मोठी प्रादेशिक पुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. त्या योजनेचा पाणी गावात पुर वाठा केला जात आहे.पण जुन्या पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीत उंदीर, पाली मेलेल्या मिळाल्या ,ती टाकी कायमची बंद करण्यासंबंधी सूचना संबंधित पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्याला देण्यात आली होती . मात्र पाणी पुरवठा बंद न करता त्याने, लोकांना पिण्यासाठी पाणी देणे सुरूच ठेवल्याचे ग्रामसेविका सरिता कटरे यांचे म्हणने आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...