Thursday 23 February 2017

वर्धा जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता कायम

वर्धा दि. 23 : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने पूर्ण बहुमत घेतले असून सत्ता कायम राखली आहे. या जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोठे प्रस्थ सुरेश देशमुख यांचा पूर्ण पराभव झाला असून राष्ट्रवादीला केवळ 1 जागा मिळू शकली. वर्धा जिल्हा परिषदेत असलेल्या 52 जागांचे निकाल घोषित झाले असून त्यापैकी भाजपला 29 जागांवर विजय मिळाला आहे. कॉंग्रेसचे नेते दत्ता मेघे भाजपमध्ये गेल्यानंतर भाजपची बाजू भक्कम झाली होती. याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला. वर्धा जिल्ह्यात कॉंग्रेसला कोणतेही नेतृत्व नाही

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...