Monday 15 May 2017

लग्न पत्रिकेतून मातेरे कुटुंबीयांचे समाजप्रबोधन



अर्जुनी मोरगाव,दि.15 : महापुरुषांचे विचार, शासनाचे धोरण शेवटपर्यंत स्थानिक पातळीवरून संदेश रूपात पोहोचविणे हे योग्य ठरते. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईच्या पत्रिकेतून हा संदेश आप्तस्वकीयांपर्यंत लग्नपत्रिकेच्या माध्यमातून उत्कृष्टपणे पोहोचविल्याचे उदाहरण ऊर्मिला रामदास मातेरे यांच्या मुलीच्या लग्न पत्रिकेतून दिसत आहे.सोशल मीडियावर फिरणार्‍या या पत्रिकेमागे  उद्धव मोहेंदळे यांची कल्पकता असून सावरटोल्याचे विजय भोवे यांनी सुरेख मांडणी करून लग्नपत्रिकेचे वेगळेपण तयार केले आहे. एकंदरीत ही पत्रिका नवसमाजनिर्मितीसाठी प्रबोधनात्मक ठरत आहे.
महापुरुषांचे विचार, शासनाचे धोरण ते शेती, आरोग्य, शिक्षणापर्यंतचा सुरेख संगम या पत्रिकेत दिसते. पाणी व्यवस्थापन शेतीसाठी सूक्ष्म सिंचन नवरीकडल्या बाजूला राष्ट्रमाता जिजाऊ, नवरदेवाकडे शिवरायांचा फोटो, महात्मा गांधीजींच्या चष्म्यातून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश जगद्गुरू तुकोबाच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे, जिजाऊ शिवरायांच्या जय घोषापासून श्रीगुरुदेवांचा संदेश दिसतो. दुसरीकडे पर्यावरणाचा ढासळणारा समतोल राखण्यासाठी केळीच्या पानावरील खाद्यान्न, मावशीच्या लग्नाला या म्हणणार्‍या बालक-बालिका, सर्व शिक्षा अभियानातून सारे शिकू-पुढे जाऊ व मतदान माझा हक्क व कर्तव्यापर्यंत राष्ट्रजागृती. पाठीमागच्या बाजूला बेटी बचाओ अभियान तर दुसरीकडे जिजाऊ व शिवाजी त्यामध्ये शेवटी वैराग्यमूर्ती गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेतून पत्रिकेचे वेगळेवच वैशिष्ट आहे. पुरोगामी विचारसरणीच्या पत्रिकेत राष्ट्र निर्मितीचे सूचक पैलू दिसून येतात.सोबतच स्वच्छतेचा संदेश ही देत आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...