Wednesday 3 May 2017

गाय वाचवण्यापेक्षा देश वाचवा: उद्धव


 मुंबई,दि.3मे- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधला असून 'गाय वाचवण्यापेक्षा देश वाचवा', असा टोलाच त्यांनी हाणला आहे. भाजप नव्हे तर देश मजबूत होण्याची गरज आहे, असेही त्यांनी सुनावले.
काश्मीरमध्ये पाक सैन्याने दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद केल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली असताना पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी 'मन की बात' नव्हे, 'गन की बात' केली पाहिजे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा एकदा भाजप आणि केंद्र सरकारच्या धोरणांचा समाचार घेतला.
एका सर्जिकल स्ट्राइकने पाकिस्तान सुधारणार नाही. पाकिस्तानला कायमची अद्दल घडवायला हवी, असेही उद्धव पुढे म्हणाले.



No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...