Monday 15 May 2017

लाखांदूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दयाराम कापगते यांचे निधन



गोंदिया,दि.15(berartimes.com)-गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध निवासी लाखांदूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दयाराम कापगते यांचे आज सोमवारला(दि.15) दुपारी 3.30 वाजता  हृद्यविकाराच्या झटक्याने डाॅ.कापगते यांच्या रुग्णालयात निधन झाले.त्यांच्या निधनामूळे एक चांगला व्यक्तिमत्व निसर्गप्रेमी हरपला आहे.भारतीय जनता पक्षाचे ते वरिष्ठ पदाधिकारी होते.कापगते यांनी गोंदिया जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद,गोंदिया जिल्हा दुग्ध सहकारी उत्पादक संघाचे सदस्य,अर्जुनी मोरगाव तालुका खरेदी विक्री सहकारी,मत्स्य सहकारी संस्थामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे.त्यांच्या मागे बराच मोठा आप्तपरिवार असून उद्या मंगळवारला सकाळी 9 वाजता त्यांच्यावर नवेगावबांध येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या मागे पत्नी ,दोन मुले, दोन मुली सुना व नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.विशेष म्हणजे त्यांनी पोलिटिकल सांयस व इतिहासात डबल एमए केलेेले असून ते कायद्याचे जाणकार होते.
माजी आमदार दयाराम कापगते यांनी 1995 मध्ये पहिल्यांदा लाखांदूर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणुक भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढविली होती.त्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या प्रमिला कुंटे यांचा पराभव करीत विजय संपादन केला होता.त्यानंतर मात्र 1999 च्या निवडणुकीत लाखांदूर मतदारसंघातून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.त्यांचा पराभव नाना पटोले यांनी केला होता.दय्रारामभाऊनी नवेगावबांधचा पर्यटन विकास व्हावा यासाठी मोठ्याप्रमाणात आपले योगदान दिले आहे.परिसरातील जंगली प्राण्यामुळे गावातील नागरिकांना धोका होऊ नये यासाठी वन्यजीव व वनविभागाच्या अधिकार्यांशी समन्वय ठेवून त्यांना सातत्याने नवेगावबांध अभयारण्यातील वन्यजीवांच्या रक्षणासाठीच नव्हे तर जंगल रक्षणासाठीही हिरहिरीने त्यांनी पुढाकार घेतला होता.
पक्षाचेच नव्हे तर आमचे आधारस्तंभ हरपले-पालकमंत्री राजकुमार बडोले
लाखांदूर मतदारसंघाचे माजी आमदार व गोंदिया जिल्हा भाजपचे अध्यक्ष राहिलेले दयारामभाऊ कापगते यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षाचेच आधारस्तंभ नव्हे तर सर्वसामान्य माझ्यासारख्या व्यक्तीचेही आधारस्तंभ हरपले असून त्यांच्या निधनाने झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे.दयारामभाऊनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकासात्मक कार्यामूळेच त्यांची जनमानसात सर्वमान्य नेते म्हणून ओळख होती.त्यांच्याच कार्यकाळात इटियाडोह धरणाच्या पाळीची उंची वाढून सिंचनाच्या क्षेत्रात वाढ होऊन मतदारसंघातील शेतकरी शेतमजूर समृध्द झाला.त्यानी नेहमीच समाजासाठीच कार्य केले असून लहान मोठा कधीच भेदभाव न करता काम कऱणारे दयाराम कापगते यांच्या निधनाने पक्षाची व जिल्ह्याची हाणी झाली असून ती भरुन निघणे कठीण आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो अशीच इश्वरचरणी प्रार्थना असल्याची प्रतिक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी बेरार टाईम्सशी बोलतांना व्यक्त केली आहे.
कुशल संघटक व्यक्तिमत्वाचे धनी-माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे
भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व लाखांदूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहिलेले आमचे सहकारी मित्र दयारामभाऊ कापगते यांच्या निधनाने एक चांगला कुशल संघटक,मनमिळाऊ व्यक्तिमत्वाचे धनी असलेले व्यक्तिमत्व हरपले असून त्यांच्या निधनाने अर्जुनी मोरगाव तालुक्याचेच नव्हे तर गोंदिया जिल्ह्यातील भाजपचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया माजी खासदार व माजी आमदार डाॅ.खुशाल बोपचे यांनी व्यक्त केली आहे.
कापगतेच्या निधनाने कुशल संघटकाची पोकळी भरुन निघणे कठिण-खासदार नाना पटोले
आमचे वरिष्ट मार्गदर्शक राहिलेले दयारामभाऊच्या निधनाचे वृत्त कळताच आपला पहिल्यांदा विश्वासच बसेना.कारण त्यांच्यासारखी चांगली व्यक्तिमत्व अचानक आम्हाला कशी काय सोडून जाऊ शकते.परंतु ईश्वरासमोर कुणाचेही चालत नसते त्यांना सकाळीच कसे तरी वाटू लागल्याने ते तपासणीसाठी गेले आणि त्यांना तिथेच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.त्यांच्या या निधनामुळे भाजपमध्येच नव्हे तर इतर पक्षातही त्यांच्या संघटनात्मक बांधिलकीची चर्चा व्हायची असे ते कुशल संघटक होते.आपण त्यांच्यासोबत निवडणुक लढून जिंकलो असलो तरी कधीही त्यांनी त्याचे वाईट न मानता नेहमीच प्रत्येक कार्यात मला सहकार्य केले.आजही मी जे काही आहे त्यांच्याच महत्वाचा वाटा दयारामभाऊंचा असून त्यांच्या निधनाने झालेली पोकळी भरुन निघणे खूप कठिण असल्याची प्रतिक्रिया खासदार नानाभाऊ पटोले यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...